शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रसायनयुक्त पाणी शेतात सोडल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

गेवराई : रसायनयुक्त पाणी शेतामध्ये सोडल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून जिनिंगच्या पाच जणांविरुद्ध गेवराईत हवा प्रदूषण, पर्यावरण संरक्षण ...

गेवराई : रसायनयुक्त पाणी शेतामध्ये सोडल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून जिनिंगच्या पाच जणांविरुद्ध गेवराईत हवा प्रदूषण, पर्यावरण संरक्षण व जलप्रदूषण अशा तीन कायद्यांनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई येथील रहिवासी महेश शिवाजीराव बरगे यांची बागपिंपळगाव शिवारातील सर्व्हे नंबर १६४ मध्ये जमीन आहे. त्यांच्या शेतजमिनीलगत कालिका फायबर्स जिनिंग चालकाने रसायनयुक्त पाणी शेतात सोडून दिले. तेच पाणी त्याच्या शेतविहिरीतून पिकांना देण्यात आले. त्यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार २०१९ पासून ते २०२१ पर्यंत सुरू होता. अखेर ६ सप्टेंबर रोजी शेतकरी महेश बरगे यांच्या फिर्यादीवरून जिनिंग मालक निलेश मोहनलाल तायल, शामसुंदर मोहनलाल तायल दोघे रा. औरंगाबाद, मुनीम लक्ष्मण दिनकर शिंगणे, ग्रेडर ओमप्रकाश रामचंद्र अग्रवाल व व्यवस्थापक शाम बद्रीप्रसाद शर्मा तिघे रा. बागपिंपळगाव अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल देशमुख करीत आहेत.