शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

‘उत्सवातून आपुलकीचे अतूट नाते निर्माण करा’

By admin | Updated: September 16, 2015 12:02 IST

गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. उत्सवांकडे मौजमजा नव्हे, तर सामाजिक एकता जोपासण्याचे माध्यम म्हणून पहा,

बीड : गणेशोत्सवातून सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. उत्सवांकडे मौजमजा नव्हे, तर सामाजिक एकता जोपासण्याचे माध्यम म्हणून पहा, असा संदेश औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. प्रेमाचा संवाद व आपुलकीचे नाते निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.मंगळवारी येथे जिल्हा पोलीस प्रशासनाने आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीय सलोखा’ हा कार्यक्रम घेतला. यावेळी ते बोलत होते.जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आ. राजेंद्र जगताप, अ‍ॅड. शेख शफीक, सय्यद नवीदुज्जमा, विविध धर्मीय गुरू यांची मंचावर उपस्थिती होती.नांगरे पाटील म्हणाले, आमच्या लहानपणी गणेश मंडळातर्फे पुस्तकांचे वाटप व्हायचे. या पुस्तकांमुळेच आम्ही घडलो. अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. उत्सवावर दुष्काळी सावट आहे. दरवर्षी २० हजार कोटी रूपये खर्च होतो. काही प्रमाणात पर्यावरणालाही बाधा पोहोचते. त्यामुळे सदसद् विवेकबुध्दीने कामे करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बाप्पा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आगमनाने विघ्न संपुष्टात यावेत, यासाठी प्रत्येकाने सामाजिक, जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधून दीर्घकालीन उपायांची गरज असल्याचे सांगितले. विविध धर्मगुरूंनीही मते मांडली. अधीक्षक अनिल पारसकर यांनी प्रास्ताविक केले. अभिनेता अक्षयकुमारने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पाठविलेल्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)