शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पतपेढी ऐवजी भूजल पेढी निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

प्रसाद चिक्षे : कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा अंबाजोगाई : भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे ...

प्रसाद चिक्षे : कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा

अंबाजोगाई :

भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य,त्यामुळे मानव आज पाणीटंचाईला सामोरे जात आहे. हे आपणच अविवेकीपणाने ओढवून घेतलेले संकट आहे. निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.परंतु,माणसाची हाव तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पतपेढीपेक्षा भूजल पेढी निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र तथा समाजचिंतक प्रसाद चिक्षे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. येथील कृषी महाविद्यालयात रासेयोच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय,अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते तर व्यासपीठावर डॉ.अरुण कदम व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चिक्षे म्हणाले, पाणी हेच जीवन आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपलं जीवन पाण्याप्रमाणे प्रवाहीपणे जगले पाहिजे. प्रसाद चिक्षे यांनी ते करत असलेल्या पाणी बचतीच्या कामाविषयीचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ.प्रताप नाळवंडीकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी केले तर आभार प्रा. संजय राठोड यांनी मानले.

जलसाक्षर व्हा

पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी कृषी अक्षराबरोबरच जल साक्षर होऊन शेतकऱ्यांचे अन्नधान्य उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहकार्य करावे. प्रक्षेत्रावर समतल चर विकसित करून जागेवर पाणी अडवून पूर्णतः जिरवावे. पाणी आणि वाणी समतोल वापरून वर्तमानाबरोबरच भविष्यकाळ ही सुनिश्चित करावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात डाॅ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.

===Photopath===

240321\120024bed_3_24032021_14.jpg