शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पतपेढी ऐवजी भूजल पेढी निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

प्रसाद चिक्षे : कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा अंबाजोगाई : भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे ...

प्रसाद चिक्षे : कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा

अंबाजोगाई :

भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य,त्यामुळे मानव आज पाणीटंचाईला सामोरे जात आहे. हे आपणच अविवेकीपणाने ओढवून घेतलेले संकट आहे. निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.परंतु,माणसाची हाव तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पतपेढीपेक्षा भूजल पेढी निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र तथा समाजचिंतक प्रसाद चिक्षे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. येथील कृषी महाविद्यालयात रासेयोच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय,अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते तर व्यासपीठावर डॉ.अरुण कदम व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चिक्षे म्हणाले, पाणी हेच जीवन आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपलं जीवन पाण्याप्रमाणे प्रवाहीपणे जगले पाहिजे. प्रसाद चिक्षे यांनी ते करत असलेल्या पाणी बचतीच्या कामाविषयीचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ.प्रताप नाळवंडीकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी केले तर आभार प्रा. संजय राठोड यांनी मानले.

जलसाक्षर व्हा

पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी कृषी अक्षराबरोबरच जल साक्षर होऊन शेतकऱ्यांचे अन्नधान्य उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहकार्य करावे. प्रक्षेत्रावर समतल चर विकसित करून जागेवर पाणी अडवून पूर्णतः जिरवावे. पाणी आणि वाणी समतोल वापरून वर्तमानाबरोबरच भविष्यकाळ ही सुनिश्चित करावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात डाॅ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.

===Photopath===

240321\120024bed_3_24032021_14.jpg