शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

पतपेढी ऐवजी भूजल पेढी निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

प्रसाद चिक्षे : कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा अंबाजोगाई : भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे ...

प्रसाद चिक्षे : कृषी महाविद्यालयात जागतिक जल दिन साजरा

अंबाजोगाई :

भूगर्भातील पाण्याचा होणारा अतिरेकी उपसा आणि निर्दयीपणे केलेली वृक्षांची कत्तल यामुळे पावसावर होणारा विपरीत परिणाम आणि त्यातून निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य,त्यामुळे मानव आज पाणीटंचाईला सामोरे जात आहे. हे आपणच अविवेकीपणाने ओढवून घेतलेले संकट आहे. निसर्ग मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.परंतु,माणसाची हाव तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पतपेढीपेक्षा भूजल पेढी निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र तथा समाजचिंतक प्रसाद चिक्षे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले. येथील कृषी महाविद्यालयात रासेयोच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय,अंबाजोगाईचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे हे होते तर व्यासपीठावर डॉ.अरुण कदम व जिमखाना उपाध्यक्ष डॉ. प्रताप नाळवंडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चिक्षे म्हणाले, पाणी हेच जीवन आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपलं जीवन पाण्याप्रमाणे प्रवाहीपणे जगले पाहिजे. प्रसाद चिक्षे यांनी ते करत असलेल्या पाणी बचतीच्या कामाविषयीचे अनुभव कथन केले. प्रास्ताविक जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ.प्रताप नाळवंडीकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी केले तर आभार प्रा. संजय राठोड यांनी मानले.

जलसाक्षर व्हा

पाणी ही नैसर्गिक संपत्ती असून त्याचे जतन व संवर्धन आवश्यक आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांनी कृषी अक्षराबरोबरच जल साक्षर होऊन शेतकऱ्यांचे अन्नधान्य उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सहकार्य करावे. प्रक्षेत्रावर समतल चर विकसित करून जागेवर पाणी अडवून पूर्णतः जिरवावे. पाणी आणि वाणी समतोल वापरून वर्तमानाबरोबरच भविष्यकाळ ही सुनिश्चित करावा असे आवाहन अध्यक्षीय समारोपात डाॅ.बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.

===Photopath===

240321\120024bed_3_24032021_14.jpg