शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांना मन:स्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:33 IST

सध्या सुट्यांचे दिवस असल्याने प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातात; परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना ...

सध्या सुट्यांचे दिवस असल्याने प्रत्येकाला पैशाची गरज आहे. अनेकजण पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जातात; परंतु त्यात पैसे नसल्याने त्यांना बँकेत जावे लागते. बँकेत रांगेत उभे राहून दोन-तीन तासांनंतर नंबर लागल्यानंतर बँकेचे कर्मचारी एटीएममधून पैसे काढण्याचा सल्ला देतात. बँक जोपर्यंत उघडत नाही. तोपर्यंत एटीएममध्ये पैसे नसतात. याच कारणाने नागरिकांना बँक उघडण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. एटीएममधून पैसे मिळत नसल्याने आणि बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

एटीएममध्ये पैसे शोधण्यासाठी नागरिकांना या एटीएममधून त्या एटीएममकडे पळावे लागत आहे. शहरातील सर्व एटीएममध्ये जाऊन पैसे मिळत नसल्याने नागरिकांची निराशा होत असून लग्नसराईत पैशाअभावी कामे खोळंबत आहेत.

यासाठी बँक प्रशासनाने एटीएममध्ये पैशाची व्यवस्था करून शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

कर्मचारी असतात मोबाइलवर व्यस्त

पैसे काढण्यासाठी बँकेत गेल्यानंतर ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत बसावे लागते. कर्मचारी समोरील काम करण्याचे सोडून मोबाइलवर बोलत बसतात. तसेच कामाचा बहाणा करून उठून जातात व अर्धा तास तिकडेच बसतात. बँक कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना कित्येक तास ताटकळत बसावे लागते. बँकेत काम सुरू असताना मोबाइलवर बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश कांबळे यांनी केली.