शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

माजलगावात नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:52 IST

माजलगाव येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.

ठळक मुद्देइन कॅमेरा सभेची मागणीसत्ताधारी नगरसेवकांनीच टाकला सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

माजलगाव : येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.

माजलगाव नगरपालिकेचे सत्तांतर होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या दरम्यान केवळ एकच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सर्वसाधारण सभा ही किमान तीन महिन्यात एकदा व्हायला हवी, मात्र मागील सात महिन्यांपासून सर्वसाधारण सभा झालेली नाही. मागे जी सभा झाली त्यात घेण्यात आलेल्या ठरावांची व प्रोसिडींगची मागणी वारंवार नगरसेवक करीत असताना देखील ती दिली जात नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजलगाव नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी आंदोलन केले होते. त्याच बरोबर आयुक्तांनाही भेटुन या बाबत तक्रार केली होती. पंधरा दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाºयांना दोन दिवसांत विरोधक नगरसेवकांनी मागितलेली माहिती देण्यात यावी, असे आदेश दिले. मुख्याधिकाºयांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली.

नगराध्यक्षांच्या मनमानी विरुध्द दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी नगरसेवकांनी येथील आ. आर. टी. देशमुख यांची भेट घेऊन नगराध्यक्षांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. यात आमदारांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले होते. मात्र, त्यानंतरही नगराध्यक्षांची मनमानी सुरुच राहिल्याने शुक्रवारी पालिकेच्या कार्यालयामध्ये बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी देखील बहिष्कार घातला. त्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली.

अध्यक्ष अन् नगरसेवकांच्या वादातमाजलगाव शहराचा विकास सहाल चाऊस हेच करु शकतात, या अपेक्षेवर जनतेने चाउस यांना निवडून दिले. नगराध्यक्ष होऊन त्यांना जवळपास एक वर्ष उलटत असताना नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वादात माजलगाव शहराचा विकास खुंटला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यांची दुरवस्था, तुबलेल्या नाल्या आदींमुळे जनता मात्र होरपळून निघाली आहे.