शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

माजलगावात नगराध्यक्ष विरुद्ध नगरसेवक संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:52 IST

माजलगाव येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.

ठळक मुद्देइन कॅमेरा सभेची मागणीसत्ताधारी नगरसेवकांनीच टाकला सर्वसाधारण सभेवर बहिष्कार

माजलगाव : येथील नगर परिषदेचे अध्यक्ष हे मनमानी स्वरुपाचा कारभार करीत असून, कुठल्याही प्रक्रियेमध्ये नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नाही तसेच मागील झालेल्या सभेचा वृत्तांत नगरसेवकांना दिला जात नाही, वेळेवर सभा घेतली जात नाही, असा आरोप करीत सत्ताधारी नगरसेवकांनीच पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्यामुळे सभा रद्द करावी लागली. त्यामुळे अध्यक्ष विरुध्द नगरसेवक असा संघर्ष पेटल्याचे पाहवयास मिळत आहे.

माजलगाव नगरपालिकेचे सत्तांतर होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या दरम्यान केवळ एकच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. सर्वसाधारण सभा ही किमान तीन महिन्यात एकदा व्हायला हवी, मात्र मागील सात महिन्यांपासून सर्वसाधारण सभा झालेली नाही. मागे जी सभा झाली त्यात घेण्यात आलेल्या ठरावांची व प्रोसिडींगची मागणी वारंवार नगरसेवक करीत असताना देखील ती दिली जात नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी माजलगाव नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी आंदोलन केले होते. त्याच बरोबर आयुक्तांनाही भेटुन या बाबत तक्रार केली होती. पंधरा दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाºयांना दोन दिवसांत विरोधक नगरसेवकांनी मागितलेली माहिती देण्यात यावी, असे आदेश दिले. मुख्याधिकाºयांनी मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली.

नगराध्यक्षांच्या मनमानी विरुध्द दोन महिन्यांपूर्वी सत्ताधारी नगरसेवकांनी येथील आ. आर. टी. देशमुख यांची भेट घेऊन नगराध्यक्षांच्या तक्रारींचा पाढा वाचला होता. यात आमदारांनी मध्यस्थी करुन प्रकरण शांत केले होते. मात्र, त्यानंतरही नगराध्यक्षांची मनमानी सुरुच राहिल्याने शुक्रवारी पालिकेच्या कार्यालयामध्ये बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर विरोधी नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी देखील बहिष्कार घातला. त्यामुळे सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली.

अध्यक्ष अन् नगरसेवकांच्या वादातमाजलगाव शहराचा विकास सहाल चाऊस हेच करु शकतात, या अपेक्षेवर जनतेने चाउस यांना निवडून दिले. नगराध्यक्ष होऊन त्यांना जवळपास एक वर्ष उलटत असताना नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या वादात माजलगाव शहराचा विकास खुंटला आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव, रस्त्यांची दुरवस्था, तुबलेल्या नाल्या आदींमुळे जनता मात्र होरपळून निघाली आहे.