शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus : बीड जिल्ह्यातील चेकपोस्टवर आता राहणार नायब तहसीलदारांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:49 IST

पथकासोबत राहून कर्तव्य बजावण्याच्या ४२ जणांना सुचना

बीड : जिल्ह्यात सध्या सर्वत्र सीमा बंदी आहे. जिल्ह्याबाहेर जाण्यास व येण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे. यासाठी जिल्ह्यात १४ ठिकाणी चेकपोस्ट केल्या आहेत. असे असले तरी जिल्ह्यात प्रवेश करणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आता प्रत्येक चेकपोस्टवर एका नायब तहसीलदारची नियूक्ती केली आहे. २४ तास ते  आपल्या पथकासोबत खडा पहारा देणार आहेत.

बीड जिल्ह्यात चौसाळा, पांढरवाडी फाटा, अंभोरा, महार टाकळी - शेवगाव, शहागड पुल, सोनपेठ फाटा, गंगाखेड रोड, गंगामसला, सादोळा, बर्दापुर फाटा, बोरगाव पिंपरी, मालेगाव, मातोरी पाथर्डी, मानूर चिंचपूर फाटा अशी १४ चेक पोस्ट तयार करण्यात आली आहेत. साधारण २० मार्च रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश काढत जिल्ह्यात येण्यासह बाहेर जाण्यास नागरिकांना बंदी घातली होती. प्रत्येक ठिकाणी आरोग्य, शिक्षण व पोलीस विभागाचे कर्मचारी नियूक्त केले होते. परंतु तरीही नागरिकांचे प्रवेश सुरू असल्याचे वारंवार जाणवत असल्याने याठिकाणी आता नायब तहसीलदारांना प्रमुख करण्यात आले आहे. प्रत्येक पोस्टवर तिघांची नियूक्ती केली असून आठ आठ तास कर्तव्य बजावणार आहेत. जिल्ह्यात ४२ नायब तहसीलदारांच्या नियूक्त्या केल्या असून तसे आदेशही शनिवारीच रेखावार यांनी काढले आहेत. 

अनाधिकृत नव्हे अधिकृत प्रवेश?जिल्ह्यात येण्यास बंदी असतानाही लोक सर्रासपणे प्रवेश करीत असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. विशेष म्हणजे प्रवेश चेकपोस्टवरूनच झाल्याचे सांगण्यात येत आहे. छुप्या मार्गांची नोंदच होत नाही. त्यामुळे हे सर्व प्रवेश अधिकृतपणे होत असून चेकपोस्टवरील यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

चेकपोस्ट तत्पर करण्याची गरजसध्या बीड जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. सुदैवाने अद्यापही बीड जिल्ह्यात रुग्ण आढळला नाही. परंतु आढळू नये, यासाठी आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. सीमा बंदी १०० टक्के बंद करण्याची गरज आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच खात्री करून सुरू ठेवणे आवश्यक आहे. यासाठी चेकपोस्टवरील बंदोबस्त अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.