शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

CoronaVirus : कोरोनामुळे सोन्यासारखी फळेही मातीमोल झाल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:13 IST

राज्य शासनाने हमीभावाने फळं खरेदी करावीत : अशोक लोढा

ठळक मुद्देशासनाने दिलासा द्यावाफळ बागेचे नियोजन ठप्प

बीड :  सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे फळबागेत पिकवलेली सोन्यासारखी फळं बागेत गळून कवडीमोल होत आहेत. कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या फळ उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने हमी भावाने शेतकºयांची फळे खरेदी करावीत, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी केली आहे.

अनेक नैसर्गिक संकटातून वाचवत पिकवलेल्या फळबागा कोरोनाच्या संकटाने उद्ध्वस्त झाल्या आहेत.  लाखो रु पये एकरी लागवड, मशागत खर्च करून मोठ्या हिमतीने बागा जोपासल्या दोन पैसे मिळतील या आशेने स्वप्न पाहणाऱ्या शेतकºयांच्या स्वप्नावर कोरोनाने पाणी फिरवले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशासह राज्यभरात लॉकडाऊन संचारबंदी चालू आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले. रस्ते निर्मनुष्य झाले बाजारपेठा ओस पडल्या. खरेदी विक्र ी मंदावली. कारखाने बंद झाली रस्त्यावरचे फळविक्र ेते गायब झाले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या द्राक्ष, पेरू, चिकू आदी बागांमधील फळांची विक्र ी होत नसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

फळबागेचे नियोजन ठप्प  मागील उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ तर पावसाळ्यात महाभयंकर पूर  तर अलीकडेच अतिवृष्टी एक ना अनेक अडचणींवर मात करत काबाडकष्टाने लाखो रु पये मशागतीवर खर्च करून मोठ्या हिंमतीने शेतकरी बांधवांनी फळबागा जोपासल्या. दरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन संचारबंदी लागू झाल्याने फळ बागेचे नियोजन ठप्प झाले. हातातोंडाशी आलेली फळबाग बाजार पेठेपासून वंचीत राहिली.ऐन फळबागांच्या हंगामांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे फळ उत्पादक शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले.

राज्य सरकारने दिलासा द्यावाआर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकरी बांधवांसाठी  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्य शासनाने शेतकºयांची  फळे हमीभावाने खरेदी करावीत. खरेदीसाठी अर्धा वाटा केंद्र सरकार उचलण्यास तयार आहे. राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेत ही  फळ खरेदीची योजना  अमलात आणली तर राज्यातील फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.  याबाबत आपण लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठवले असून यावर निश्चितपणे सकारात्मक निर्णय होऊन शेतकरी बांधवांना न्याय मिळेल अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी व्यक्त केली आहे.