शहरं
Join us  
Trending Stories
1
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
2
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
3
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
4
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
5
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
6
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
7
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
8
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
9
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
10
वर्षभरात बॉलिवूडची बांधकाम उद्योगात  तब्बल एक हजार कोटींची उलाढाल; ८५५ कोटींच्या व्यवहारासह जितेंद्र पहिल्या क्रमांकावर
11
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
12
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
13
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
14
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
15
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
16
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
17
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
18
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
19
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनामुळे सोन्यासारखी फळेही मातीमोल झाल्याने शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 20:13 IST

राज्य शासनाने हमीभावाने फळं खरेदी करावीत : अशोक लोढा

ठळक मुद्देशासनाने दिलासा द्यावाफळ बागेचे नियोजन ठप्प

बीड :  सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे फळबागेत पिकवलेली सोन्यासारखी फळं बागेत गळून कवडीमोल होत आहेत. कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या फळ उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने हमी भावाने शेतकºयांची फळे खरेदी करावीत, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी केली आहे.

अनेक नैसर्गिक संकटातून वाचवत पिकवलेल्या फळबागा कोरोनाच्या संकटाने उद्ध्वस्त झाल्या आहेत.  लाखो रु पये एकरी लागवड, मशागत खर्च करून मोठ्या हिमतीने बागा जोपासल्या दोन पैसे मिळतील या आशेने स्वप्न पाहणाऱ्या शेतकºयांच्या स्वप्नावर कोरोनाने पाणी फिरवले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून देशासह राज्यभरात लॉकडाऊन संचारबंदी चालू आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले. रस्ते निर्मनुष्य झाले बाजारपेठा ओस पडल्या. खरेदी विक्र ी मंदावली. कारखाने बंद झाली रस्त्यावरचे फळविक्र ेते गायब झाले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पिकवलेल्या द्राक्ष, पेरू, चिकू आदी बागांमधील फळांची विक्र ी होत नसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. 

फळबागेचे नियोजन ठप्प  मागील उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ तर पावसाळ्यात महाभयंकर पूर  तर अलीकडेच अतिवृष्टी एक ना अनेक अडचणींवर मात करत काबाडकष्टाने लाखो रु पये मशागतीवर खर्च करून मोठ्या हिंमतीने शेतकरी बांधवांनी फळबागा जोपासल्या. दरम्यान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन संचारबंदी लागू झाल्याने फळ बागेचे नियोजन ठप्प झाले. हातातोंडाशी आलेली फळबाग बाजार पेठेपासून वंचीत राहिली.ऐन फळबागांच्या हंगामांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे फळ उत्पादक शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले.

राज्य सरकारने दिलासा द्यावाआर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकरी बांधवांसाठी  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी घोषणा केल्याप्रमाणे राज्य शासनाने शेतकºयांची  फळे हमीभावाने खरेदी करावीत. खरेदीसाठी अर्धा वाटा केंद्र सरकार उचलण्यास तयार आहे. राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेत ही  फळ खरेदीची योजना  अमलात आणली तर राज्यातील फळ उत्पादक शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.  याबाबत आपण लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे व केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठवले असून यावर निश्चितपणे सकारात्मक निर्णय होऊन शेतकरी बांधवांना न्याय मिळेल अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी व्यक्त केली आहे.