शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

कोरोना लसीकरण मोहीम, आतापर्यंत केवळ ९२ लसी गेल्या वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST

तीन दिवसांत १५०० पैकी ९५० लाभार्थ्यांना लस, ५५० गैरहजर लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य ...

तीन दिवसांत १५०० पैकी ९५० लाभार्थ्यांना लस, ५५० गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोराेना लस देणे सुरू केले आहे. यात आतापर्यंत ९५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यातील ५५० अद्यापही गैरहजर आहेत. या सर्वांना लस देताना आतापर्यंत केवळ ९२ लसी वाया गेल्या आहेत. एकूण लसीच्या १० टक्के लसी वाया जातात, असे गृहीत धरले जाते. परंतु, बीडमध्ये याची टक्केवारी केवळ १.१ असल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयासह आष्टी, अंबाजोगाई, परळी आणि गेवराईत हे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला १७ हजार ६६४० लसी प्राप्त झाल्या आहेत. आठ हजार ८८० लोकांना ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांसह फ्रंट लाइन सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

घाबरू नका

n लस दिल्यानंतर काहींना ताप येणे, उलट्या-मळमळ अशी लक्षणे आढळत आहेत.

n त्यामुळे काही लाेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लस घ्यावी की नाही, याबाबत ते द्विधा मन:स्थितीत आहेत.

n परंतु अशी लक्षणे आढळत असतात. त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून १० जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्टेज जातात.