शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

कोरोना लसीकरण मोहीम, आतापर्यंत केवळ ९२ लसी गेल्या वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:34 IST

तीन दिवसांत १५०० पैकी ९५० लाभार्थ्यांना लस, ५५० गैरहजर लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य ...

तीन दिवसांत १५०० पैकी ९५० लाभार्थ्यांना लस, ५५० गैरहजर

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : राज्यासह जिल्हाभरात १६ जानेवारीपासून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोराेना लस देणे सुरू केले आहे. यात आतापर्यंत ९५० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यातील ५५० अद्यापही गैरहजर आहेत. या सर्वांना लस देताना आतापर्यंत केवळ ९२ लसी वाया गेल्या आहेत. एकूण लसीच्या १० टक्के लसी वाया जातात, असे गृहीत धरले जाते. परंतु, बीडमध्ये याची टक्केवारी केवळ १.१ असल्याने दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयासह आष्टी, अंबाजोगाई, परळी आणि गेवराईत हे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्याला १७ हजार ६६४० लसी प्राप्त झाल्या आहेत. आठ हजार ८८० लोकांना ही लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांसह फ्रंट लाइन सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

घाबरू नका

n लस दिल्यानंतर काहींना ताप येणे, उलट्या-मळमळ अशी लक्षणे आढळत आहेत.

n त्यामुळे काही लाेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लस घ्यावी की नाही, याबाबत ते द्विधा मन:स्थितीत आहेत.

n परंतु अशी लक्षणे आढळत असतात. त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे.

एका बाटलीत १० डोस

लसीच्या एका बाटलीतून १० जणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते. तसेच डोस भरतानादेखील काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वेस्टेज जातात.