शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा काळ साहित्यसृष्टीसाठी प्रभावी राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:03 IST

शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर) : साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे ...

शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर)

: साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी व्यक्त केले. ते मानूर येथील श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरीमध्ये एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक राजकुमार तांगडे यांच्यासह नागनाथ मानूर संस्थानचे महंत शिवाचार्य महाराज, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्री, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, रामदास बडे, समितीच्या सभापती उषा सरवदे, सामाजिक कार्यकर्त्या चंपाबाई पानसंबळ, सरपंच चंद्रकला वनवे, उपसरपंच शौकत सय्यद, खलंदर पठाण, आदिनाथ नागरगोजे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आर.एस. बडजाते उपस्थित होते.

यावेळी साळेगावकर म्हणाले, प्राथमिक शिक्षण अनिवार्यपणे मराठी भाषेत देऊन मराठी शाळा टिकविणे गरजेचे आहे. लेखनाची बीजे शाळेत रुजायला हवीत. मराठी भाषेचे अस्तित्व जर आपणाला चिरकाल टिकवायचे असेल तर मराठी चित्रपट, नाटकं पाहणे गरजेचे आहे. आई जर जगली तर मावशीला अर्थ असल्याचे सांगत मराठी भाषेचा वापर सर्वत्र होणे गरजेचे आहे. कोरोनाकाळ खऱ्या अर्थाने मराठी साहित्याच्या दृष्टीने प्रभावी राहिला आहे. साहित्यिकांना या काळात वेळ मिळाला त्यामुळे नवीन साहित्य तयार होण्यासाठी मदत झाल्याचे ते म्हणाले. साहित्य संमेलनात सालाबादप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.

लक्ष्यवेधी ठरली ग्रंथदिंडी

मानूर बसस्थानक ते श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी यादरम्यान महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसह साहित्यप्रेमींची ग्रंथदिंडी लक्ष्यवेधी ठरली. शिवाय ग्रंथदिंडीमध्ये वारकरी मुलांनी आपला सहभाग नोंदवून टाळ-पखावाजच्या गजरात विठूनामाचा जयघोष केला. मानूर गावातील महिलांनी आपल्या दारासमोर सडा-रांगोळ्या काढून ग्रंथदिंडीचे स्वागत केले.