शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा काळ साहित्यसृष्टीसाठी प्रभावी राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:03 IST

शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर) : साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे ...

शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर)

: साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी व्यक्त केले. ते मानूर येथील श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरीमध्ये एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक राजकुमार तांगडे यांच्यासह नागनाथ मानूर संस्थानचे महंत शिवाचार्य महाराज, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्री, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, रामदास बडे, समितीच्या सभापती उषा सरवदे, सामाजिक कार्यकर्त्या चंपाबाई पानसंबळ, सरपंच चंद्रकला वनवे, उपसरपंच शौकत सय्यद, खलंदर पठाण, आदिनाथ नागरगोजे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आर.एस. बडजाते उपस्थित होते.

यावेळी साळेगावकर म्हणाले, प्राथमिक शिक्षण अनिवार्यपणे मराठी भाषेत देऊन मराठी शाळा टिकविणे गरजेचे आहे. लेखनाची बीजे शाळेत रुजायला हवीत. मराठी भाषेचे अस्तित्व जर आपणाला चिरकाल टिकवायचे असेल तर मराठी चित्रपट, नाटकं पाहणे गरजेचे आहे. आई जर जगली तर मावशीला अर्थ असल्याचे सांगत मराठी भाषेचा वापर सर्वत्र होणे गरजेचे आहे. कोरोनाकाळ खऱ्या अर्थाने मराठी साहित्याच्या दृष्टीने प्रभावी राहिला आहे. साहित्यिकांना या काळात वेळ मिळाला त्यामुळे नवीन साहित्य तयार होण्यासाठी मदत झाल्याचे ते म्हणाले. साहित्य संमेलनात सालाबादप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.

लक्ष्यवेधी ठरली ग्रंथदिंडी

मानूर बसस्थानक ते श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी यादरम्यान महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसह साहित्यप्रेमींची ग्रंथदिंडी लक्ष्यवेधी ठरली. शिवाय ग्रंथदिंडीमध्ये वारकरी मुलांनी आपला सहभाग नोंदवून टाळ-पखावाजच्या गजरात विठूनामाचा जयघोष केला. मानूर गावातील महिलांनी आपल्या दारासमोर सडा-रांगोळ्या काढून ग्रंथदिंडीचे स्वागत केले.