शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

कोरोनाचा काळ साहित्यसृष्टीसाठी प्रभावी राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:03 IST

शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर) : साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे ...

शिरुरकासार (श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी, मानूर)

: साहित्यिकांनी भंगलेली मनं जोडण्याची कामे करून समाजभान जपले पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर यांनी व्यक्त केले. ते मानूर येथील श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरीमध्ये एकता फाउंडेशनच्या वतीने आयोजित तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक राजकुमार तांगडे यांच्यासह नागनाथ मानूर संस्थानचे महंत शिवाचार्य महाराज, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्री, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, रामदास बडे, समितीच्या सभापती उषा सरवदे, सामाजिक कार्यकर्त्या चंपाबाई पानसंबळ, सरपंच चंद्रकला वनवे, उपसरपंच शौकत सय्यद, खलंदर पठाण, आदिनाथ नागरगोजे, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आर.एस. बडजाते उपस्थित होते.

यावेळी साळेगावकर म्हणाले, प्राथमिक शिक्षण अनिवार्यपणे मराठी भाषेत देऊन मराठी शाळा टिकविणे गरजेचे आहे. लेखनाची बीजे शाळेत रुजायला हवीत. मराठी भाषेचे अस्तित्व जर आपणाला चिरकाल टिकवायचे असेल तर मराठी चित्रपट, नाटकं पाहणे गरजेचे आहे. आई जर जगली तर मावशीला अर्थ असल्याचे सांगत मराठी भाषेचा वापर सर्वत्र होणे गरजेचे आहे. कोरोनाकाळ खऱ्या अर्थाने मराठी साहित्याच्या दृष्टीने प्रभावी राहिला आहे. साहित्यिकांना या काळात वेळ मिळाला त्यामुळे नवीन साहित्य तयार होण्यासाठी मदत झाल्याचे ते म्हणाले. साहित्य संमेलनात सालाबादप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आले.

लक्ष्यवेधी ठरली ग्रंथदिंडी

मानूर बसस्थानक ते श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरी यादरम्यान महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसह साहित्यप्रेमींची ग्रंथदिंडी लक्ष्यवेधी ठरली. शिवाय ग्रंथदिंडीमध्ये वारकरी मुलांनी आपला सहभाग नोंदवून टाळ-पखावाजच्या गजरात विठूनामाचा जयघोष केला. मानूर गावातील महिलांनी आपल्या दारासमोर सडा-रांगोळ्या काढून ग्रंथदिंडीचे स्वागत केले.