शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोना होऊन गेलेल्या लोकांना इतरही आजार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यात संभ्रम आहे. परंतु, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोना होऊन गेलेल्या लोकांना इतरही आजार आहेत. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यात संभ्रम आहे. परंतु, हे रूग्ण जर भूल देण्यासाठी तंदरूस्त असतील तर २० दिवसानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया करता येऊ शकतात. ज्यांना अत्यावश्यक आहे जसे की, शस्त्रक्रिया केली तरच ते वाचू शकतात, अशांची शस्त्रक्रिया तत्काळ करू शकतात, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सामान्यांनी मनातील संभ्रम दूर करून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला वेळोवेळी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना कोमॉर्बिडीटी व इतर आजार आहेत. अनेकांना शस्त्रक्रियांचीही गरज आहे. परंतु, आपल्याला आताच कोरोना होऊन गेला आहे, आता शस्त्रक्रिया केली तर काही त्रास होईल का? असा प्रश्न त्यांना पडत आहे. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना संपर्क केला. त्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर २० दिवसांनी शस्त्रक्रिया करण्यास मुभा आहे. परंतु, संबंधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी, शरीर तंदरूस्त असणे गरजेचे आहे. भूल देण्यासाठी रूग्णाच्या शरिराने प्रतिसाद दिल्यावर शस्त्रक्रिया करण्यास काहीच अडचण नाही. ज्यांना कोरोना झाला आहे अथवा २० दिवस झालेले नाहीत, त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत त्या - त्या वेळची तपासणी करून शस्त्रक्रिया करू शकतो. शस्त्रक्रिया केली नाही तर त्या रूग्णाच्या जिवाला धोका असेल तर त्याची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

हट्ट धरू नका, सर्व तपासण्या करा

काही लोक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे हट्ट धरतात. परंतु, असे करणे आरोग्यासाठी लाभदायक कमी आणि घातकच जास्त ठरू शकते. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना आणि रूग्णाची परिस्थिती पाहूनच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. मुद्दाम कोणी टाळाटाळ करत असेल तर त्याची रितसर तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी याबाबतही जागरूक राहावे.

--

कोरोना होऊन गेल्यावर २० दिवसांनी शस्त्रक्रिया करू शकतो. परंतु, त्यासाठी रुग्णाचे शरीर भूल देण्यासाठी तंदुरूस्त असावे. तसेच कोरोनाबाधित अथवा नुकताच मुक्त झालेल्या रूग्णाच्या शस्त्रक्रियेबाबत खूपच गरज असेल (शस्त्रक्रिया केली नाही तर जिवाला धोका होईल) तरच ती करता येऊ शकते. मनातील गैरसमज दूर करून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड