शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

वर्षभरात आष्टी तालुक्यात दहा हजार लोकांना कोरोनाची लागण ; २७० जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

आरोग्य विभाग दिवसरात्र झटत असला तरी इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी सक्रिय नसल्याने तालुक्यातील आकडा कमी होताना दिसत नाही. आष्टी ...

आरोग्य विभाग दिवसरात्र झटत असला तरी इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी सक्रिय नसल्याने तालुक्यातील आकडा कमी होताना दिसत नाही.

आष्टी तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेऐवजी दुसरी लाट भयंकर होती आणि आहे. त्यातच प्रशासनाने घालून दिलेले नियम कोणत्याच गावात, बाजारात, सार्वजनिक कार्यक्रमात, पाळले जात नसल्याने तालुक्यातील आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने प्रशासनाचे आता डोळे उघडले आहेत. दिवसरात्र एकटा आरोग्य विभाग गावोगावी फिरत आहे. पण त्याच्या दिमतीला महसूल, पंचायत समिती यासह इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी असणे बंधनकारक असताना असे होताना दिसत नसल्याने व त्यांच्या हालगर्जीपणामुळे कोरोना उतरणीला लागत नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने गांभीर्याने घेऊन नागरिकांना विश्वासात घेत, ग्रामसुरक्षा समितीच्या लोकांना दैनंदिन हजेरी व गावात नजर ठेवायला लावली तर नक्कीच कोरोना संख्या आटोक्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी सांगितले.

अशी आहे आरोग्य विभागाकडे आकडेवारी

गेल्या वर्षभरात आष्टी तालुक्यात १० हजार ३६९ रुग्ण आढळले असून २७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात आरटीपीसीआर च्या एकूण १२ हजार ८७१ तर अँटिजनच्या एकूण ५० हजार ३८९ असे एकूण ६२ हजार २६० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. आष्टी तालुक्यात सध्या २८९ रुग्ण ॲक्टिव्ह असून ७३ रुग्ण आष्टी ग्रामीण रुग्णालयातील सीसीसी. सेंटर येथे तर आयटीआय. सेंटर मध्ये २५ तर मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथे १५ रुग्ण उपचार घेत आहेत. बाकी १७६ रुग्णांना रेफर करण्यात आले आहे. असे आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी लोकमतला सांगितले.