शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

अंबाजोगाई तालुक्यात ९५ गावांना कोरोनाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

अंबाजोगाई : गेल्या दोन आठवड्यांपासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. अंबाजोगाई ...

अंबाजोगाई : गेल्या दोन आठवड्यांपासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण ९९ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ९४ गावांत कोरोनाची लागण झाली आहे, तर पाच गावांनी कोरोनाला गावाबाहेरच रोखले आहे.

अंबाजोगाई तालुक्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख वाढतच चालला आहे. प्रारंभीच्या काळात शहरी भागात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. तालुक्यात आजपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या नऊ हजारांच्या जवळ जाऊन थांबली आहे; तर ग्रामीण भागात आजपर्यंत चार हजार कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील गावोगावी असणाऱ्या कोरोनाच्या १४०० रुग्णांवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांना आवश्यक त्या सेवा-सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जे रुग्ण गंभीर स्थितीत आहेत, अशा रुग्णांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, तर त्रास नसलेल्या रुग्णांना लोखंडी सावरगाव व इतर संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते.

अंबाजोगाई तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण एप्रिलमध्ये वाढले.

या गावांमध्ये मोठा प्रादुर्भाव

एप्रिल महिन्यात अंबाजोगाई तालुक्यात पाच हजारांजवळ रुग्णसंख्या गेली आहे. तालुक्यातील ९४ गावांना कोरोनाचा वेढा आहे. यात प्रामुख्याने जोगाईवाडी, मोरेवाडी, शेपवाडी, चनई या अंबाजोगाईलगतच्या गावांना कोरोनाची मोठी बाधा झाली आहे; तर तालुक्यातील चनई, साकूड, घाटनांदुर, लोखंडी सावरगाव, जवळगाव, राडी, मुडेगाव, भतानवाडी, पिंपळा धायगुडा अशा विविध गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत.

पाच गावांनी कोरोना रोखला

अंबाजोगाई तालुक्यात केवळ पाच गावांना कोरोनाला रोखता आले. इतर ९४ गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशाही स्थितीत तालुक्यातील दगडवाडी, राक्षसवाडी, मुर्ती, दरडवाडी व सातेफळ ही पाच गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.

रुग्णसंख्या वाढल्यास त्या गावामध्ये अँटिजेन टेस्टसाठी कॅम्प लावला जातो.

ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे उपाय सुरू आहेत. ज्यांना लक्षणे व त्रास नाही, अशा २७८ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे. - संदीप घोणसीकर, गटविकास अधिकारी, अंबाजोगाई