शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरोनाने बिघडवले गावातील आर्थिक चक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

बेरोजगारांची संख्या वाढली शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी अंबाजोगाई : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन ...

बेरोजगारांची संख्या वाढली

शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी

अंबाजोगाई : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन करण्यात आले. सध्या शिथिलता देण्यात आली असली, तरी धोका अद्याप कायम आहे. दरम्यान, गावागावात बेरोजगारांची संख्या वाढली असून, त्यांच्यात नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.

कोरोना संकटामुळे व्यवसाय- उद्योगधंदांना पाहिजे तशी गती नाही. मजुरांच्या हाताला काम उरले नाही. परिणामी, मजुरांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहे. सध्या शेती हंगामाचे दिवस असल्यामुळे काही जण शेतीत राबू लागले. काही दशकांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, अशी गावखेड्यात अवस्था होती. मात्र, लहरी निसर्ग, सरकारची शेतकरी विरोधी धोरण, मजुरांचे वाढते दर शेतमालाला खर्चाच्या तुलनेत कमी हमी भाव, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट आदी बाबींमुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहेत. परिणामी, बेरोजगार युवक शहरात जाऊन नोकरी करू लागला. मात्र, कोरोना संकटामुळे सर्वांचे गणित बिघडले आहे.

अनेकांनी छोटा व्यवसाय सुरू केला आहे, तर काही जणांनी आई-वडिलांना मदत म्हणून शेतात काम करणे सुरू केले आहे. अनेक लहान-मोठ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेतीतूनच होतो. यावरून आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व लक्षात येते. मात्र, दिवसेंदिवस शेती करणेही कठीण होत आहे. रासायनिक खते, बियाण्यांचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यातच निसर्गही साथ देत नसल्यामुळे बेरोजगार युवक शेती करण्यापेक्षा दुसऱ्यांकडे नोकर राहण्याला पसंती देत आहेत.