शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

कोरोनाने बिघडवले गावातील आर्थिक चक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

बेरोजगारांची संख्या वाढली शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी अंबाजोगाई : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन ...

बेरोजगारांची संख्या वाढली

शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी

अंबाजोगाई : मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन करण्यात आले. सध्या शिथिलता देण्यात आली असली, तरी धोका अद्याप कायम आहे. दरम्यान, गावागावात बेरोजगारांची संख्या वाढली असून, त्यांच्यात नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने रोजगारासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे.

कोरोना संकटामुळे व्यवसाय- उद्योगधंदांना पाहिजे तशी गती नाही. मजुरांच्या हाताला काम उरले नाही. परिणामी, मजुरांची प्रचंड आर्थिक कोंडी होत आहे. सध्या शेती हंगामाचे दिवस असल्यामुळे काही जण शेतीत राबू लागले. काही दशकांपूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, अशी गावखेड्यात अवस्था होती. मात्र, लहरी निसर्ग, सरकारची शेतकरी विरोधी धोरण, मजुरांचे वाढते दर शेतमालाला खर्चाच्या तुलनेत कमी हमी भाव, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट आदी बाबींमुळे शेती व्यवसाय तोट्यात येत आहेत. परिणामी, बेरोजगार युवक शहरात जाऊन नोकरी करू लागला. मात्र, कोरोना संकटामुळे सर्वांचे गणित बिघडले आहे.

अनेकांनी छोटा व्यवसाय सुरू केला आहे, तर काही जणांनी आई-वडिलांना मदत म्हणून शेतात काम करणे सुरू केले आहे. अनेक लहान-मोठ्या उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा शेतीतूनच होतो. यावरून आर्थिक विकासात शेतीचे महत्त्व लक्षात येते. मात्र, दिवसेंदिवस शेती करणेही कठीण होत आहे. रासायनिक खते, बियाण्यांचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यातच निसर्गही साथ देत नसल्यामुळे बेरोजगार युवक शेती करण्यापेक्षा दुसऱ्यांकडे नोकर राहण्याला पसंती देत आहेत.