शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दुसऱ्या वर्षीही खरीप हंगामावर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST

राजेश राजगुरू लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या ...

राजेश राजगुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप हंगामावर मागील वर्षीप्रमाणे संकट आहे. या चिंतेत शेतकरी सापडला आहे. सरकारला मात्र दुसऱ्या वर्षीही अनुदान, विमा, गारपिटीची भरपाई, कर्जमाफीचा विसर पडलेला दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.

गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबुज, खरबुज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता; पण गतवर्षीप्रमाणे याही वेळी ऐन पीक पदरात पडतानाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे ऊत्पन्न घटले. इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. खरीप अवघ्या महिनाभरावर आला असताना बी-बियाणे कसे घ्यावे या विचारात असलेले शेतकरी मशागत करून पुन्हा निसर्गावर आशा ठेवून आपले भविष्य आजमावणार आहेत.

....

कोरोनात कर्जमाफीही लांबली

कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे नुकसान केले; पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखाचे पीक रुपयात आले. कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही लांबली. काही काम करावे, तर तेही जमत नसल्याने शेतकरी मशागतीला पैसे नसल्याने सावकाराच्या दारात उभा राहिला आहे.

.....

अनुदान, खरीप विमाही मिळेना..

गेवराई तालुक्यातील काही गावांना गतवर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान अजून वाटप झालेले नाही, तर काही गावांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान येणे बाकी आहे. गतवर्षी अतिवृष्टीने पिके मातीमोल झाली. पण, विमा कंपनीकडून जाचक अटीमुळे अजूनही पदरात काहीच पडलेले नाही. त्यातच कर्जमाफीत उशिरा नाव आलेले अजून कर्जापासून वंचित आहेत. गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ती मदतही कोरोनात अडकली असल्याचे चित्र आहे. असे असताना यंदाही खरीप हंगामाची सुगीही कर्ज काढूनच करावी लागण्याचे चिन्हे आहेत.