शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

दुसऱ्या वर्षीही खरीप हंगामावर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST

राजेश राजगुरू लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या ...

राजेश राजगुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप हंगामावर मागील वर्षीप्रमाणे संकट आहे. या चिंतेत शेतकरी सापडला आहे. सरकारला मात्र दुसऱ्या वर्षीही अनुदान, विमा, गारपिटीची भरपाई, कर्जमाफीचा विसर पडलेला दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.

गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबुज, खरबुज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता; पण गतवर्षीप्रमाणे याही वेळी ऐन पीक पदरात पडतानाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाखमोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे ऊत्पन्न घटले. इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसानच गळाले आहे. खरीप अवघ्या महिनाभरावर आला असताना बी-बियाणे कसे घ्यावे या विचारात असलेले शेतकरी मशागत करून पुन्हा निसर्गावर आशा ठेवून आपले भविष्य आजमावणार आहेत.

....

कोरोनात कर्जमाफीही लांबली

कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे नुकसान केले; पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखाचे पीक रुपयात आले. कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही लांबली. काही काम करावे, तर तेही जमत नसल्याने शेतकरी मशागतीला पैसे नसल्याने सावकाराच्या दारात उभा राहिला आहे.

.....

अनुदान, खरीप विमाही मिळेना..

गेवराई तालुक्यातील काही गावांना गतवर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान अजून वाटप झालेले नाही, तर काही गावांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान येणे बाकी आहे. गतवर्षी अतिवृष्टीने पिके मातीमोल झाली. पण, विमा कंपनीकडून जाचक अटीमुळे अजूनही पदरात काहीच पडलेले नाही. त्यातच कर्जमाफीत उशिरा नाव आलेले अजून कर्जापासून वंचित आहेत. गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ती मदतही कोरोनात अडकली असल्याचे चित्र आहे. असे असताना यंदाही खरीप हंगामाची सुगीही कर्ज काढूनच करावी लागण्याचे चिन्हे आहेत.