शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दुसऱ्या वर्षीही खरीप हंगामावर कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

राजेश राजगुरू लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या ...

राजेश राजगुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

तलवाडा : कोरोनामुळे व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले आहे. असे असताना अवघ्या महिन्याभरावर आलेल्या खरीप हंगामावर मागील वर्षीप्रमाणे संकट आहे. या चिंतेत शेतकरी सापडला आहे. सरकारला मात्र दुसऱ्या वर्षीही अनुदान, विमा, गारपिटीची भरपाई, कर्जमाफीचा विसर पडलेला दिसत आहे. यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे.

गतवर्षीच्या मुबलक पावसामुळे पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके घेतली होती. यात टरबूज, खरबूज, काकडी, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांचा समावेश होता; पण गतवर्षीप्रमाणे याही वेळी ऐन पीक पदरात पडतांनाच कोरोनाच्या संचारबंदीमुळे लाख मोलाची पिके कवडीमोल दरात विकावी लागली. परिणामी खर्चही निघाला नसल्याने शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीने कापूस, तूर, सोयाबीनचे उत्पन्न घटले. इतर पिकांना लाखोंचा खर्च करून पदरात काहीच न पडल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. खरीप अवघ्या महिनाभरावर आला असताना बी-बियाणे कसे घ्यावे या विचारात असलेले शेतकरी मशागत करून पुन्हा निसर्गावर आशा ठेवून आपले भविष्य आजमावणार आहेत.

कोरोनात कर्जमाफी ही लांबली

कोरोनाने जगातील प्रत्येक घटकाचे नुकसान केले ; पण यात शेतकरी मात्र पुरता कोलमडल्याचे दिसत आहे. लाखांचे पीक रुपयात आले. कर्जमाफी होऊन नवीन कर्ज मिळेल ही अपेक्षाही लांबली. काही काम करावे, तर तेही जमत नसल्याने शेतकरी मशागतीला पैसे नसल्याने सावकाराच्या दारात उभा राहिला आहे.

.....

अनुदान, खरीप विमाही मिळेना

गेवराई तालुक्यातील काही गावांना गतवर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान अजून वाटप झालेले नाही, तर काही गावांना दुसऱ्या टप्प्याचे अनुदान येणे बाकी आहे. गतवर्षी अतिवृष्टीने पिके मातीमोल झाली. पण, विमा कंपनीकडून जाचक अटीमुळे अजूनही पदरात काहीच पडलेले नाही. त्यातच कर्जमाफीत उशिरा नाव आलेले अजून कर्जापासून वंचित आहेत.

गारपिटीमुळे ही नुकसान

गेल्या महिन्यात तालुक्यातील अनेक गावांत गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ती मदतही कोरोनात अडकली असल्याचे चित्र आहे. असे असताना यंदाही खरीप हंगामही कर्ज काढूनच करावा लागण्याचे चिन्हे आहेत.