शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

वन्यजिवांच्या प्रगणनेला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वन्यजिवांची प्रगणना करताना सोशल डिस्टन्स पाळता येणार नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला नायगाव मयूर अभयारण्यातील ...

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वन्यजिवांची प्रगणना करताना सोशल डिस्टन्स पाळता येणार नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला नायगाव मयूर अभयारण्यातील वन्यजिवांची प्रगणना स्थगित करण्यात आली आहे. दरवर्षी वन्यजीव विभाग व डब्ल्यूपीएसए मार्फत बुद्ध पौर्णिमेला अभयारण्य परिक्षेत्रातील वन्यजिवांची प्रगणना करण्यात येते. त्यासाठी वन विभागाचे अधिकारी, वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व त्यांचे सहकारी तसेच निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासक पौर्णिमेपूर्वीच तयारीला लागतात. वन हद्दीतील पाणवठे, पाणथळांच्या ठिकाणी मचाण उभारतात. प्रत्येक मचाणीवर एक कर्मचारी, सोबत एक निसर्गप्रेमी इच्छेनुसार बसतात. येथे दिवसरात्र बसून, वन कर्मचारी व निसर्गप्रेमी वन्यजीव प्रगणना करीत असतात. त्यातूनच प्राण्यांची संख्या घटली की वाढली, याची कल्पना येत असते. मचाणीवर एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील. सोशल डिस्टन्स पाळला जाणार नाही. प्रगणनेत कर्मचाऱ्यांसोबत एक निसर्गप्रेमी असतो. ही व्यक्ती बाहेरगावातून आलेली असते. या सर्व बाबींचा विचार करीत कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २६ मे रोजी होणारी अभयारण्यातील वन्यजिवांची प्रगणना वन्यजीव विभागाने बंद ठेवली आहे.