शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लग्न सोहळ्यांना ब्रेक - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:33 IST

अंबाजोगाई : मराठी वैशाख महिना म्हणजेच मे महिन्यात दरवर्षी सर्वात जास्त विवाह होतात;मात्र कोरोनामुळे या महिन्यात लग्न सोहळ्यांना मोठा ...

अंबाजोगाई : मराठी वैशाख महिना म्हणजेच मे महिन्यात दरवर्षी सर्वात जास्त विवाह होतात;मात्र कोरोनामुळे या महिन्यात लग्न सोहळ्यांना मोठा ब्रेक लागला. परिणामी अनेकांचा हिरमोड झाला आहे. आचारी, वाजंत्री, मंगल कार्यालयवाले यांचेही बुकिंग रद्द झाले आहे.

कोरोनामुळे अनेकांचे लग्न सोहळे लांबणीवर पडले आहेत. अनेकांना आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते. यासाठी सोयीस्कर असा शुभमुहूर्त ठरविला जातो. वैशाख महिन्यात अनेक विवाह मुहूर्त असतात. या महिन्यात शेतीची कामे झालेली असतात. तर शाळांना सुट्टी असते. परीक्षा संपलेल्या असतात. त्यामुळे मे महिना सोयीस्कर ठरतो.

कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याने सलग दोन वर्षे मार्च, एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. शासनानेही विवाह सोहळ्यावर अनेक बंधने लादली आहेत. विवाह सोहळ्यात केवळ २५ जणांना उपस्थिती लावता येते. यातही सर्वच वऱ्हाडी मंडळींची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. उपस्थितांची अट शासनाने घातल्याने अनेक जवळच्या नातेवाईकांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे. तर वाहने बंद असल्याने व खासगी वाहनांसाठी परवानगी घ्यावी लागते. अशा अनेक अडचणींचा सामना विवाहासाठी उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांना करावा लागत आहे. त्यातच बाजारपेठ बंद असल्याने विवाहासाठीची खरेदी ही व्यवस्थित होत नाही. तर जे विवाह सोहळे पार पडत आहेत त्या कुटुंबीयांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विवाह मुहूर्त

आता अनेक जोडप्यांनी कोरोनानंतर असणाऱ्या विवाह मुहूर्तांचा शोध सुरू आहे. मे महिन्यात १४ मुहूर्त पंचांगात आहेत. तर जून महिन्यात आठ मुहूर्त आहेत.

व्यावसायिकांना आर्थिक फटका

लग्न म्हटले की, मंगल कार्यालय, आचारी, बँडबाजा, मंडप, घोडा, फोटोग्राफर, वाहने यांचे आगोदरच बुकिंग करावे लागते. तर लग्नपत्रिका, कपडेलत्ते, भांडीकुंडी, फर्निचर, दागदागिने यासह रुखवत आदी वस्तू लग्नमुहूर्तापूर्वी काही दिवस अगोदर खरेदी कराव्या लागतात; मात्र लॉकडाऊनमुळे आलेली बंधने, त्यात साधेपणाने उरकले जाणारे विवाह सोहळे यामुळे संबंधित व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. परिणामी आर्थिक चक्र मोठ्या प्रमाणात बिघडले आहे.