शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

तत्कालीन जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून न्यायालयाचाच अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST

बीड : अभियंता दंडे प्रतिनियुक्ती प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे ऐकण्यात आले ...

बीड : अभियंता दंडे प्रतिनियुक्ती प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे ऐकण्यात आले आहे. मात्र ही कारवाई केवळ राजकीय दबावापोटी करण्यात आली असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना, असा निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. कुठल्या एका अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठवावे, अशी मागणी करणे चुकीचे कसे? लोकप्रतिनिधी म्हणून केलेली मागणी ही चुकीची नाहीच. त्यामुळे रेखावार यांनी दिलेले निर्देश हे चुकीचे असून हेतुपुरस्सर आहेत. याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी म्हटले आहे

नगरपालिकेत सुरू असलेल्या कामांवर गुणवत्ता आणि दर्जेदार कामे व्हावीत म्हणून एखाद्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्याची मागणी करणे हे एक लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्ष म्हणून आपले कर्तव्य होते परंतु विरोधकांनी याबाबत कामात खोडा घालण्याच्या उद्देशाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. अभियंत्यांना नियुक्त करण्याची मागणी करणे गैर नाही मात्र या प्रकरणात केवळ आपली बदनामी करण्यासाठी राजकीय हेतूने आणि जनतेत आपल्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे हेतूने कारवाई सुरू करण्यात आली. मात्र याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. यावर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. विशेष म्हणजे या प्रकरणात तक्रारदाराने नगराध्यक्षावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीही केली नाही किंवा तसे न्यायालयाचे निर्देशही नाहीत. असे असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीडमधून जाता जाता अपात्रतेचे निर्देश देण्याच्या कागदावर कोणत्या उद्देशाने सही केली हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यांनी दिलेले निर्देश हे केवळ राजकीय दबावापोटी असून याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे

अभियंता दंडे यांना नियुक्त करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर पत्र दिले असेल तर त्यात लगेच भ्रष्टाचार झाल्याचा जावईशोध विरोधकांनी करू नये, एक वर्षापासून याप्रकरणी कुठलीही कारवाई का झाली नाही स्वतः पदावर असताना जिल्हाधिकारी रेखावर यांनी अशी कारवाई न करता जाताजाता कुणाला निर्देश दिले, बदली झाल्यानंतर १५ दिवसाने हे निर्देश काढलेच कसे? हाही संशोधनाचा भाग आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्यात केवळ शिवसेनेच्या नगर पालिकेला टार्गेट केले जात असून विकास कामात खोडा घालणाऱ्या विरोधात आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे कॉग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले