शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; राज्यात ३० लाख कोरोनाबाधितांच्या सहवासितांची नोंदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST

बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला असला तरी त्यांची माहिती पाेर्टलवर अपडेट करण्यात राज्यातील २७ जिल्हे ...

बीड : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात आला असला तरी त्यांची माहिती पाेर्टलवर अपडेट करण्यात राज्यातील २७ जिल्हे कमी पडले आहेत. अद्याप ३० लाख लोकांची माहिती अपडेट न केल्याने आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढले आहे, तर दुसऱ्या बाजूला नोंदणी करण्यात बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबादचा नीचांक आहे.

राज्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. हा संसर्ग कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असले तरी अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही, तसेच नवे रुग्ण शोधण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध आराेग्य विभाग घेत आहे. राज्यात आढळलेल्या ५१ लाख ४३ हजार ९६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतल्यानंतर त्यांची माहिती पोर्टलवर तात्काळ अपडेट करणे आवश्यक होते; परंतु आतापर्यंत केवळ २१ लाख ४८ हजार ४४७ रुग्णांच्या सहवासितांचीच माहिती अपडेट केली आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले असून, त्यांची टक्केवारी ८० पेक्षा कमी आहे. यात सर्वांत आघाडीवर औरंगाबाद असून, केवळ ३० टक्के माहिती अपडेट केल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र काढून माहिती अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत.

बीड जिल्ह्याचे काम ९९ टक्के

राज्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात बीड जिल्हा सुरुवातीपासूनच अव्वल राहिला आहे. तसेच याची माहितीही आरोग्य विभागाच्या नियंत्रण कक्षातून नियमित अपडेट केली जाते. यात बीड जिल्हा राज्यात अव्वल असून, ९९ टक्के माहिती अपडेट केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी वारंवार आढावा घेतला. डॉ. बेग व नियंत्रण कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेत माहिती दिल्याने जिल्हा अव्वल राहिला आहे.

...अशी आहे राज्याची आकडेवारी

माहिती अपलोड करण्यात आलेली

जिल्हानिहाय आकडेवारी...

बीड ९९ टक्के, जालना ९८, सातारा ९१, अमरावती ८८, नांदेड ८७, धुळे ८६, सांगली ८४, सिंधुदुर्ग ७९, नागपूर ७८, नाशिक ७७, कोल्हापूर ७७, परभणी ७६, यवतमाळ ७२, भंडारा ७०, अकोला ७, सोलापूर ६९, जळगाव ६४, रायगड ६४, नंदुरबार ६३, हिंगोली ६३, गडचिरोली ६१, बुलडाणा ६१, वर्धा ५८, मुंबई ५६, पालघर ५२, अहमदनगर ५२, उस्मानाबाद ५१, चंद्रपूर ४९, रत्नागिरी ४३, पुणे ४२, लातूर ३७, वाशिम ३६, ठाणे ३३, औरंगाबाद ३०, अशी टक्केवारी आहे.