शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अरूंद रस्त्यामुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST

वाळू उपसा सुरूच गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. त्याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ...

वाळू उपसा सुरूच

गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. त्याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे गोदाकाठच्या नदीपात्रांमध्ये दिसत आहे. अवैध वाळूमाफियांवर नियंत्रण ठेवून कारवाईची मागणी होत आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करा

अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणावर साठलेले आहेत. या कचऱ्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात येत नसल्याने कचऱ्याचे मोठ-मोठे ढीग ठिकठिकाणी दिसून येतात. परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनाने कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.

गुरांना उपचार मिळेनात

चौसाळा : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार घेण्यासाठी अनेक पशुपालक आपल्या जनावरांना घेऊन येतात. मात्र, त्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी अनेकवेळा उपस्थित नसल्याने उपचाराविनाच परतावे लागत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी पशुमालक, ग्रामस्थांमधून केली जात आहे.

बाजारात फळांची विक्री वाढली

अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या बाजारपेठेत केळी, मोसंबी, पेरू, सफरचंद, डाळिंब, अंजीर या फळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजारात दररोज आवकही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सी विटॅमिनच्या फळांना मागणी असून परवडणारे दर असल्याने ग्राहकही फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत तसेच सहसा उन्हाळ्यात येणारी फळे जसे की, टरबूज, खरबूज आदी या दिवसांत मिळत असल्याने नागरिकांचा ओढा ही फळे खरेदीकडेही दिसून येत आहे.

हिंगणी ते नांदूर रस्त्याची दुरावस्था कायम

बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार जडू लागले आहेत. अनेक वेळा मागणी करूनही रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने या भागातील नागरिकांना याचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला आहे.