शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

विमा कपंनी, कृषी विभागाकडे पीक नुकसानीच्या तक्रारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, तसेच कृषी विभागात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे त्यांना विमा कंपनीकडून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, तसेच शासनानेदेखील नुकसानभरपाई हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यात महिन्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली असून, २७ व २८ सप्टेंबरला मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बळिराजा हवालदिल झाला असून, १०० टक्के सर्वच पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

पंचनाम्याचे नाटक बंद करा

सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे, तर काही ठिकाणी पिकांसह शेतजमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्याचे नाटक बंद करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

कृषी विभागाचे आवाहन

पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची तक्रार करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central हे ॲप डाऊनलोड करावे अन्यथा ई-मेल - pikvima@aicofindia.com तसेच

कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-४१९-५००४ नोंदवावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.

260921\26_2_bed_23_26092021_14.jpg

पालसिंगण येथील सोयाबीन पिकात साचलेले पाणी