शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

विमा कपंनी, कृषी विभागाकडे पीक नुकसानीच्या तक्रारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, तसेच कृषी विभागात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे त्यांना विमा कंपनीकडून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, तसेच शासनानेदेखील नुकसानभरपाई हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यात महिन्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली असून, २७ व २८ सप्टेंबरला मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बळिराजा हवालदिल झाला असून, १०० टक्के सर्वच पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

पंचनाम्याचे नाटक बंद करा

सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे, तर काही ठिकाणी पिकांसह शेतजमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्याचे नाटक बंद करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

कृषी विभागाचे आवाहन

पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची तक्रार करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central हे ॲप डाऊनलोड करावे अन्यथा ई-मेल - pikvima@aicofindia.com तसेच

कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-४१९-५००४ नोंदवावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.

260921\26_2_bed_23_26092021_14.jpg

पालसिंगण येथील सोयाबीन पिकात साचलेले पाणी