शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमा कपंनी, कृषी विभागाकडे पीक नुकसानीच्या तक्रारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:37 IST

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी ...

बीड : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पीक विमा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे, तसेच कृषी विभागात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरला आहे त्यांना विमा कंपनीकडून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, तसेच शासनानेदेखील नुकसानभरपाई हेक्टरी ५० हजार रुपयांप्रमाणे देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यात महिन्याच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी सुरू झाली असून, २७ व २८ सप्टेंबरला मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बळिराजा हवालदिल झाला असून, १०० टक्के सर्वच पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

पंचनाम्याचे नाटक बंद करा

सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका बसला आहे, तर काही ठिकाणी पिकांसह शेतजमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शासनाने पंचनाम्याचे नाटक बंद करून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.

कृषी विभागाचे आवाहन

पीक विमाधारक शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची तक्रार करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central हे ॲप डाऊनलोड करावे अन्यथा ई-मेल - pikvima@aicofindia.com तसेच

कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८००-४१९-५००४ नोंदवावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे.

260921\26_2_bed_23_26092021_14.jpg

पालसिंगण येथील सोयाबीन पिकात साचलेले पाणी