शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

‘अंबाजोगाई’च्या जमीन विक्रीला सहकारमंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने पुणे येथील साखर आयुक्तांची परवानगी मिळवून २५ एकर जमीन विकली होती. याबाबत माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या जमीन विक्रीला स्थगिती दिली आहे.

जमीन विक्रीप्रकरणी शेतकरी, सभासद शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालीदास आपेट यांनी पुढाकार घेऊन या आदेशास विरोध करून आंदोलन पुकारले होते. ७ सप्टेंबर रोजी सोळंके यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे एक लेखी तक्रार दाखल केली होती. जमीन विक्रीच्या सर्व व्यवहाराला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली होती.

...

काय होती तक्रार...

अंबाजोगाई सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे कारखाना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोट्यात आहे. कारखान्यातील कामगारांचे सुमारे २० कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. ऊसतोडणी यंत्रणा व वाहतूक ठेकेदारांचेसुद्धा कोट्यवधीचे देणे थकीत आहे. शेतकऱ्यांची बाकी थकीत असल्यामुळे कारखान्याने सर्व्हे नं. ४०/२ मधील २४.०० हेक्टर आर. जमिनीपैकी २५ एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव तयार करून साखर आयुक्तांना दिला होता. चुकीच्या पद्धतीने जमीन विक्री करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. कारखान्याच्या जमिनीचे बाजार मूल्य एकरी १ कोटीच्यावर असतानासुद्धा बोगस मूल्यांकन रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन अतिशय कमी किमतीमध्ये विक्री केली आहे. त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही सोळंके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

....

अंबाजोगाई कारखाना दोन वेळा दिवाळखोरीत निघाला. २००६ पासून आम्ही बँकेचे कर्ज फेडले. राज्यातील सर्वच साखर कारखाने अडचणीत आहेत. अनेकांनी बँकेचे कर्ज देण्यासाठी कारखाने विक्रीस काढले. आम्हाला कोणत्याही बँकेने पैसे मागितले तरी दिले नाहीत. शेतकरी, कामगारांची कामधेनू चालावी या सामाजिक बांधीलकीतून आम्ही कारखाना चालविला आहे. शेतकरी, कामगारांचे संसार चालावेत, यासाठी जमीन विक्रीची परवानगी मागितली. त्यास कायदेशीर मान्यता मिळवून जमीन विक्री करून एफआरपीप्रमाणे देणे दिले. याकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्याचे राजकीय भांडवल करू नये.

-रमेश आडसकर, अध्यक्ष, अंबाजोगाई साखर कारखाना.