शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबाजोगाई’च्या जमीन विक्रीला सहकारमंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने पुणे येथील साखर आयुक्तांची परवानगी मिळवून २५ एकर जमीन विकली होती. याबाबत माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या जमीन विक्रीला स्थगिती दिली आहे.

जमीन विक्रीप्रकरणी शेतकरी, सभासद शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालीदास आपेट यांनी पुढाकार घेऊन या आदेशास विरोध करून आंदोलन पुकारले होते. ७ सप्टेंबर रोजी सोळंके यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे एक लेखी तक्रार दाखल केली होती. जमीन विक्रीच्या सर्व व्यवहाराला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली होती.

...

काय होती तक्रार...

अंबाजोगाई सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे कारखाना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोट्यात आहे. कारखान्यातील कामगारांचे सुमारे २० कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. ऊसतोडणी यंत्रणा व वाहतूक ठेकेदारांचेसुद्धा कोट्यवधीचे देणे थकीत आहे. शेतकऱ्यांची बाकी थकीत असल्यामुळे कारखान्याने सर्व्हे नं. ४०/२ मधील २४.०० हेक्टर आर. जमिनीपैकी २५ एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव तयार करून साखर आयुक्तांना दिला होता. चुकीच्या पद्धतीने जमीन विक्री करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. कारखान्याच्या जमिनीचे बाजार मूल्य एकरी १ कोटीच्यावर असतानासुद्धा बोगस मूल्यांकन रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन अतिशय कमी किमतीमध्ये विक्री केली आहे. त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही सोळंके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

....

अंबाजोगाई कारखाना दोन वेळा दिवाळखोरीत निघाला. २००६ पासून आम्ही बँकेचे कर्ज फेडले. राज्यातील सर्वच साखर कारखाने अडचणीत आहेत. अनेकांनी बँकेचे कर्ज देण्यासाठी कारखाने विक्रीस काढले. आम्हाला कोणत्याही बँकेने पैसे मागितले तरी दिले नाहीत. शेतकरी, कामगारांची कामधेनू चालावी या सामाजिक बांधीलकीतून आम्ही कारखाना चालविला आहे. शेतकरी, कामगारांचे संसार चालावेत, यासाठी जमीन विक्रीची परवानगी मागितली. त्यास कायदेशीर मान्यता मिळवून जमीन विक्री करून एफआरपीप्रमाणे देणे दिले. याकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्याचे राजकीय भांडवल करू नये.

-रमेश आडसकर, अध्यक्ष, अंबाजोगाई साखर कारखाना.