शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
4
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
5
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
6
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
7
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
8
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
9
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
10
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
11
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
12
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
13
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
14
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
15
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
16
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
17
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
18
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
19
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
20
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

‘अंबाजोगाई’च्या जमीन विक्रीला सहकारमंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०२०-२१ मधील गळीत हंगामाच्या थकीत बिलातील पैसे देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने पुणे येथील साखर आयुक्तांची परवानगी मिळवून २५ एकर जमीन विकली होती. याबाबत माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळंके यांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. दरम्यान, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या जमीन विक्रीला स्थगिती दिली आहे.

जमीन विक्रीप्रकरणी शेतकरी, सभासद शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालीदास आपेट यांनी पुढाकार घेऊन या आदेशास विरोध करून आंदोलन पुकारले होते. ७ सप्टेंबर रोजी सोळंके यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे एक लेखी तक्रार दाखल केली होती. जमीन विक्रीच्या सर्व व्यवहाराला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली होती.

...

काय होती तक्रार...

अंबाजोगाई सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष रमेश आडसकर व संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळे कारखाना १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोट्यात आहे. कारखान्यातील कामगारांचे सुमारे २० कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. ऊसतोडणी यंत्रणा व वाहतूक ठेकेदारांचेसुद्धा कोट्यवधीचे देणे थकीत आहे. शेतकऱ्यांची बाकी थकीत असल्यामुळे कारखान्याने सर्व्हे नं. ४०/२ मधील २४.०० हेक्टर आर. जमिनीपैकी २५ एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव तयार करून साखर आयुक्तांना दिला होता. चुकीच्या पद्धतीने जमीन विक्री करण्यास आयुक्तांनी परवानगी दिली. कारखान्याच्या जमिनीचे बाजार मूल्य एकरी १ कोटीच्यावर असतानासुद्धा बोगस मूल्यांकन रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन अतिशय कमी किमतीमध्ये विक्री केली आहे. त्यामुळे कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही सोळंके यांनी तक्रारीत म्हटले आहे.

....

अंबाजोगाई कारखाना दोन वेळा दिवाळखोरीत निघाला. २००६ पासून आम्ही बँकेचे कर्ज फेडले. राज्यातील सर्वच साखर कारखाने अडचणीत आहेत. अनेकांनी बँकेचे कर्ज देण्यासाठी कारखाने विक्रीस काढले. आम्हाला कोणत्याही बँकेने पैसे मागितले तरी दिले नाहीत. शेतकरी, कामगारांची कामधेनू चालावी या सामाजिक बांधीलकीतून आम्ही कारखाना चालविला आहे. शेतकरी, कामगारांचे संसार चालावेत, यासाठी जमीन विक्रीची परवानगी मागितली. त्यास कायदेशीर मान्यता मिळवून जमीन विक्री करून एफआरपीप्रमाणे देणे दिले. याकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्याचे राजकीय भांडवल करू नये.

-रमेश आडसकर, अध्यक्ष, अंबाजोगाई साखर कारखाना.