शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पंधरा वीस दिवसांपासून पाटोदा शहरास पिण्याचे पाणी नाही - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

पाटोदा : पाटोदा शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगर पंचायतद्वारा नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत ...

पाटोदा : पाटोदा शहरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून नगर पंचायतद्वारा नळाला पाणी न सोडल्यामुळे लोक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. काही लोक विकत पाणी घेऊन आपली तहान भागवत आहेत. मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन पाटोदा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा नसता नगरपंचायतवर महिला हंडा मोर्चा काढतील, असा इशारा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा निला पोकळे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पाटोदा शहराच्या क्रांतीनगर ,जयसिंग नगर तसेच शिवाजी नगर, माउली नगर आदी भागात गेल्या १५ ते २० दिवसांपासून नगरपंचायतद्वारा पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. लोकांना पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर भटकंती करावी लागत आहे. कारण पाटोदा शहरातील अनेक विंधन विहिरी व तसेच विहिरीच्या पाण्याची पातळी खाली गेली असून अनेक विंधन विहिरी बंद पडल्या आहेत. त्यामुळे लोकांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.

विशेष म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते लोक दोनशे रुपये तीनशे रुपये घेऊन आपली पाण्याची तहान भागवत आहेत. नगरपंचायतला अनेक वेळा लोकांनी पाणी संदर्भात विनवण्या केल्या मात्र नगरपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. यामुळे त्रस्त होऊन पाटोदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष निला पोकळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन पाणी सोडण्याची विनंती केली आहे. एक दोन दिवसात जर पाणी सोडले नाही तर शहरातील महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.

===Photopath===

250321\25bed_3_25032021_14.jpg

===Caption===

राष्ट्रवादी महिला अध्यक्षा निला पोकळे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना पिण्याच्या पाण्यासंदर्भात निवेदन दिले.