शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:42 IST

वहवणी : आरटीपीसीआर स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. स्वतःला व कुटुंबाला समाजाला धोका निर्माण होईल असे ...

वहवणी : आरटीपीसीआर स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. स्वतःला व कुटुंबाला समाजाला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे तसेच प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चौधरी यांनी केले आहे.

वडवणी येथे संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी दोन दिवसांचा विलंब लागत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गात वाढ होत तर नाही ना अशी शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना आजाराचे निदान करण्यासाठी सध्या अँटिजंन आणि आरटीपीसीआर या दोन चाचण्या घेतल्या जात आहेत. अँटिजेन चाचणीमुळे संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, याचे निदान लगेच होत आहे. मात्र, आरटीपीसीआर चाचणीचे निदान यायला दोन दिवसांचा कालावधी लागत आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्तीने होम क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. मात्र, असे न करता आरटीपीसीआर स्वॅब दिलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असली तरी ती सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्याला काही झालेच नाही, या आविर्भावात कुटुंबात किंवा समाजात खुलेआम फिरतो व अनेक जणांच्या संपर्कात येतो. यामुळे कुटुंबातील किंवा समाजातील अन्य व्यक्तींना संसर्गाचा धोका होऊ शकतो. यामुळे आरटीपीसीआर स्वॅब दिल्यानंतर नागरिकांनी होम क्वारंटाईन राहण्याची दक्षता घेतली पाहिजे, असे डाॅ. घुबडे, डाॅ. चौधरी म्हणाले.