शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

गावाचा एकोपा टिकविण्यासाठी चोपणवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:33 IST

माजलगाव : राजकारणामुळे गावागावात होणारे भांडण होऊ नये म्हणून तालुक्यातील चोपणवाडी येथील गावकऱ्यांनी एक बैठक घेऊन सात जागांसाठी केवळ ...

माजलगाव : राजकारणामुळे गावागावात होणारे भांडण होऊ नये म्हणून तालुक्यातील चोपणवाडी येथील गावकऱ्यांनी एक बैठक घेऊन सात जागांसाठी केवळ सातच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली.

माजलगाव तालुक्यातील चोपणवाडी हे गाव अत्यंत लहान.

केवळ १०० ते ११० उमरे असलेले हे गाव असून या गावची लोकसंख्याही एक हजाराच्या जवळपास आहे, तर ४७५ मतदार आहेत. या गावात सर्व समाजाचे लोक राहत असून जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. यामुळे यांची शेतीवरच उपजीविका चालते.

चोपणवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक मागील महिन्यात लागल्यानंतर या गावातील सर्व पक्षांच्या लोकांनी एकत्र बसून गावचा एकोपा टिकविण्यासाठी, भावकी भावकीत भांडण होऊ नये म्हणून व गावच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले. त्यानंतर गावातील सर्व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली व त्यात निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांची नावे घेऊन त्यातील कामे करणाऱ्या लोकांना सर्वानुमते उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ सातच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एकाचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला नाही व कोणी कोणावर आक्षेपही घेतला नाही. यामुळे या गावची निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्यात जमा असून त्याच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे.

बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये

गणेश वनवे, मोहन वनवे, बलभीम वनवे, शोभा भीमराव काटे, सोनाली विलास बडे, रत्नमाला अंगद ढाणे व शेख रेश्मा राजू यांचा समावेश आहे.

आम्ही पक्ष, संघटना बाजूला ठेवत

गावच्या विकासासाठी व गावातील सर्वांमध्ये एकोपा राहावा म्हणून गावपातळीवर निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला व सात जागांसाठी केवळ सातच लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याव्यतिरिक्त कोणीच उमेदवारी दाखल केली नाही.

-रमेश वनवे, ग्रामस्थ, चोपणवाडी