शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

बालकांचा गुन्हेगारीत समावेश धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

बीड : बालकांचा वाढत असलेला गुन्हेगारीतील समावेश ही धोक्याची घंटा असून, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनासोबतच पालकांनी देखील काळजी घेणे ...

बीड : बालकांचा वाढत असलेला गुन्हेगारीतील समावेश ही धोक्याची घंटा असून, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनासोबतच पालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बालकांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वाढलेली आहे. रोज नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा बंदोबस्त वेळोवेळी केला जातो. मात्र, अनेक काही प्रकरणांमध्ये १८ वर्षाखालील नाबालीक मुलांचा समावेश असल्याचे चित्र आहे. याची कारणं मात्र, विविध गुन्ह्यात वेगवेगळी आहेत. सामाजिक वातावरण, मित्रांची संगत सिनेमातील कथा, गरिबी, पालक व मुलांची व्यसनाधिनता, शिक्षणाचा अभाव यासह इतर कारणांमुळे मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताता आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी विळख्यात अडकताना दिसून येत आहे. दरम्यान याला आळा घालण्यासाठी पालकांसोबतच, शिक्षक आणि समाज म्हणून आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.

मागील घडलेल्या काही घटनांमध्ये महिला अत्याचार, चोरी, विनयभंग यासारख्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. विद्यालात किंवा महाविद्याल शिक्षण घेत असताना, मुलं वयात येत असतात. त्यांना या वयात लैंगिक आकर्षण असते मात्रा, यासंबंधित असलेला शिक्षणाचा अभाव यामुळे विनयभंग किंवा अत्याचाराचे गुन्हे घडण्याची शक्यता असते. असे मत राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी व्यक्त केले.

कायद्यातील तरतुदी

१८ वर्षाखालील विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नसतो. मुलांना जे वातावरण मिळते तसे ते घडत असतात. या विधीसंघर्षाला समाज जबाबदार आहे. अशा मुलांना बालन्यायमंडळासमोर उपस्थित केल्यानंतर बालन्यायमंडळ त्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करते अशी कायद्यात तरतुद असून, त्याला शिक्षण किंवा व्यावसाय शिक्षण दिले जाते. अशा स्वरूपाच्या विधीसंघर्षग्रस्त मुलांचे समोपदेशन व मार्गदर्शन केले जाते. केले जाते.

पालकांचे देखील करावे लागते समोपदेशन

एखाद्या प्रकरणात मुलगा विधीसंघर्षग्रस्त झाला तर, पालकांची मानसिकता त्याला पाठिंबा देण्याची नसते. त्यामुळे जामीन घेण्यासाठी देखील ते येत नाहीत. त्यानंतर पालकांना या मुलाने असे का केले याविषयी समजूत घालून समोपदेशन करावे लगते. दरम्यान अनेक विधिसंघर्ष मुलांमध्ये काळानुसार चांगले बदल देखील झालेले आहेत. असे देखील राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितले.

१८ वर्षाखालील मुलांवर दाखल गुन्हे

२०१९

अत्याचार -४

चोरी -२

खंडणी -१

विनयभंग-१

२०२०

चोरी २

अनैसर्गिक संभोग-१

खुनाचा प्रयत्न-१