शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

बालकांचा गुन्हेगारीत समावेश धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

बीड : बालकांचा वाढत असलेला गुन्हेगारीतील समावेश ही धोक्याची घंटा असून, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनासोबतच पालकांनी देखील काळजी घेणे ...

बीड : बालकांचा वाढत असलेला गुन्हेगारीतील समावेश ही धोक्याची घंटा असून, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनासोबतच पालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बालकांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वाढलेली आहे. रोज नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा बंदोबस्त वेळोवेळी केला जातो. मात्र, अनेक काही प्रकरणांमध्ये १८ वर्षाखालील नाबालीक मुलांचा समावेश असल्याचे चित्र आहे. याची कारणं मात्र, विविध गुन्ह्यात वेगवेगळी आहेत. सामाजिक वातावरण, मित्रांची संगत सिनेमातील कथा, गरिबी, पालक व मुलांची व्यसनाधिनता, शिक्षणाचा अभाव यासह इतर कारणांमुळे मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताता आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी विळख्यात अडकताना दिसून येत आहे. दरम्यान याला आळा घालण्यासाठी पालकांसोबतच, शिक्षक आणि समाज म्हणून आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.

मागील घडलेल्या काही घटनांमध्ये महिला अत्याचार, चोरी, विनयभंग यासारख्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. विद्यालात किंवा महाविद्याल शिक्षण घेत असताना, मुलं वयात येत असतात. त्यांना या वयात लैंगिक आकर्षण असते मात्रा, यासंबंधित असलेला शिक्षणाचा अभाव यामुळे विनयभंग किंवा अत्याचाराचे गुन्हे घडण्याची शक्यता असते. असे मत राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी व्यक्त केले.

कायद्यातील तरतुदी

१८ वर्षाखालील विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नसतो. मुलांना जे वातावरण मिळते तसे ते घडत असतात. या विधीसंघर्षाला समाज जबाबदार आहे. अशा मुलांना बालन्यायमंडळासमोर उपस्थित केल्यानंतर बालन्यायमंडळ त्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करते अशी कायद्यात तरतुद असून, त्याला शिक्षण किंवा व्यावसाय शिक्षण दिले जाते. अशा स्वरूपाच्या विधीसंघर्षग्रस्त मुलांचे समोपदेशन व मार्गदर्शन केले जाते. केले जाते.

पालकांचे देखील करावे लागते समोपदेशन

एखाद्या प्रकरणात मुलगा विधीसंघर्षग्रस्त झाला तर, पालकांची मानसिकता त्याला पाठिंबा देण्याची नसते. त्यामुळे जामीन घेण्यासाठी देखील ते येत नाहीत. त्यानंतर पालकांना या मुलाने असे का केले याविषयी समजूत घालून समोपदेशन करावे लगते. दरम्यान अनेक विधिसंघर्ष मुलांमध्ये काळानुसार चांगले बदल देखील झालेले आहेत. असे देखील राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितले.

१८ वर्षाखालील मुलांवर दाखल गुन्हे

२०१९

अत्याचार -४

चोरी -२

खंडणी -१

विनयभंग-१

२०२०

चोरी २

अनैसर्गिक संभोग-१

खुनाचा प्रयत्न-१