शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे राजे होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:37 IST

माजलगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याने लोकांना स्वराज्याबद्दल आपुलकी होती. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे ...

माजलगाव : छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याने लोकांना स्वराज्याबद्दल आपुलकी होती. छत्रपती शिवाजी महाराज दूरदृष्टीचे राजे होते. त्यांनी जलव्यवस्थापन व पर्यावरणाविषयी विशेष लक्ष दिले, असे प्रतिपादन आ. प्रकाश सोळंके यांनी केले.

येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार, डॉ. एन. के.मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. सोळंके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व जातीनिरपेक्ष व्यवस्था निर्माण करून गुणवत्ता आणि निष्ठा असणारे मावळे निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

शिवजयंतीनिमित्त महाविद्यालयात सामान्य ज्ञान व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आ. सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धेत हरी गायकवाड, गणेश तौर, बाळासाहेब पुजारी व रांगोळी स्पर्धेत गायत्री चाळक,अमृता विभुते,ज्ञानेश्वरी फपाळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. प्रा. बालाजी बोडके यांनी आभार मानले.