शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्यामुळे वनराई वाचवण्याचे वन विभागापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:31 IST

राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे लावलेली झाडे वाचवण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे.

ठळक मुद्देवन विभागाचे आवाहन : विविध सामाजिक संघटनांनी घ्यावा पुढाकार

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे लावलेली झाडे वाचवण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे.जुलै महिन्यातील पावसाच्या आधारावर दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जादा वृक्षांची लागवड वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे. मागील तीनही वर्षांत बीड जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहज पूर्ण केले आहे. जून, जुलै महिन्यातील झालेल्या पावसानंतर जिल्हाभरातील डोंगररांगांवर झाडे लावण्याची मोहीम राबवली होती.उद्दिष्टपूर्तीसाठी वनविभागासह शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्याने ते पूर्ण झाले. या वृक्ष लागवडीमुळे बोडख्या डोंगररांना हिरवा शालू घातल्याचे स्वरुप आले होते. वनविभागाने पोषक वातावरण व मृदेची प्रत पाहूनच विविध झाडांची लागवड केली होती. यामुळे झाडांची मुळे लवकरात लवकर जमिनीत रुजली. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्यावाचून झाडे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध माध्यमातून झाडे ठिकवण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न होत आहेत.वन विभागाच्या उपाययोजनारोपांची लागवड केल्यानंतर जवळपास ४५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोपे सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठवण्यासाठी वन विभागाच्या वतीने पाणवठे तायर केले होेते. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यावर तुषर सिंचन, सौरपंपाचा वापर करुन पाणी देण्याचे काम सुरु आहे. जिथे याची सोय नाही त्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे, रोपांजवळ ओलावा टिकून राहण्यासाठी मातीचा भर देण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :Beedबीडforest departmentवनविभाग