शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बीड शहर ‘ओडीएफ प्लस’ करण्याचे पालिकेसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:27 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले.

ठळक मुद्देसाहित्य चोरी : तपासणी समिती देणार अचानक भेट

बीड : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये बीड शहर हागणदारीमुक्त करून स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. पालिकेने सर्व सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी बल्ब, पाण्याची टाकी, तोट्या, आरसे व इतर साहित्य बसवून ते सुविधायुक्त केले. मात्र, यातील बहुतांश साहित्य चोरी गेले आहे. ‘ओडीएफ प्लस’ करण्यासाठी शौचालयांचे गुण सर्वात जास्त महत्वाचे आहेत. मात्र, साहित्य चोरी गेल्याने आता ‘ओडीएफ प्लस’ शहर कसे बनवायचे, असे आव्हान बीड पालिकेसमोर आहे.शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना आणि उपक्रम हाती घेतले जात आहेत. यातीलच एक स्वच्छ सर्वेक्षण आहे. यावर्षी शहरे हागणदारीमुक्त करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. यासाठी सर्वच नगर पालिका परिश्रम घेत आहेत. बीड पालिकाही मागे नाही.बीड शहरातील ३७ सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या टाक्या, तोड्या, आरसे, भांडे व इतर साहित्य बसविले आहे. मात्र, रमाईनगर व इतर शौचालयांच्या ठिकाणचे साहित्यच चोरी गेल्याचे पाहणीतुन समोर आले आहे. प्रकाशासाठी बसविलेले बल्ब तर काही तासांतच चोरी गेल्याचे समोर आले आहे. एकीकडे सुविधा दिल्या जात असताना दुसऱ्या बाजुला असे चोरीचे प्रकार घडत असल्याने शहर ‘ओडिएफ प्लस’ कसे करायचे? असे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.आष्टी, गेवराईला अचानक भेटीपालिकांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल इनस्पेक्शन) समिती येणार आहे. यापुर्वी या समितीने अचानक आष्टी आणि गेवराई पालिकेची भेट देऊन तपासणीही केली आहे. बीड पालिकेचीही अचानक कधीही तपासणी होऊ शकते. सार्वजनिक शौचालयांनाच सार्वाधीक गुण आहेत. मात्र, साहित्य चोरी गेल्याने आता बीड पालिकेला ही समिती किती गुण देणार आणि समितीसमोर बीड पालिका हा सर्व प्रकार कसा मांडणार, हे वेळच ठरविणार आहे.

टॅग्स :BeedबीडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान