शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र ...

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र शासनाने आज पिकांच्या आधारभूत किमतीत तुटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने थावरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

थावरे म्हणाले की, सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत भरघोस वाढत करत आहे. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. याबाबत केंद्र शासनही कसलाच विचार करत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हे माहिती असूनही याकडे केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने आज पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणत आहे. केंद्राने आज जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढवून शेतकऱ्यांना गाजर दाखविण्याचे काम केंद्राने केले आहे. आजघडीला कापसाची बॅग, वेचणीचा खर्च, औषधे, खतांच्या वाढलेल्या किमती पाहता कापसाला ६७२५ रुपये आधारभूत किंमत मिळायला पाहिजे. नांगरणी, मजुरी तसेच ऊस शेताबाहेर काढणे असा खर्च पाहता उसाचा एफआरपी ३८५० रुपये करा, तुरीला ६३०० असा भाव असून तो ७०५० रुपये करावा, अशी मागणी शेतकरी नेते भाई थावरे यांनी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे तोच हमीभाव ठेवून आधारभूत किमतीत शंभर, दोनशे रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे थावरे म्हणाले.

------

राज्य सरकारचे केले अभिनंदन

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मार्चमध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे शेतकरी नेते भाई थावरे यांनी स्वागत केले आहे.