शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र ...

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र शासनाने आज पिकांच्या आधारभूत किमतीत तुटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने थावरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

थावरे म्हणाले की, सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत भरघोस वाढत करत आहे. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. याबाबत केंद्र शासनही कसलाच विचार करत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हे माहिती असूनही याकडे केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने आज पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणत आहे. केंद्राने आज जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढवून शेतकऱ्यांना गाजर दाखविण्याचे काम केंद्राने केले आहे. आजघडीला कापसाची बॅग, वेचणीचा खर्च, औषधे, खतांच्या वाढलेल्या किमती पाहता कापसाला ६७२५ रुपये आधारभूत किंमत मिळायला पाहिजे. नांगरणी, मजुरी तसेच ऊस शेताबाहेर काढणे असा खर्च पाहता उसाचा एफआरपी ३८५० रुपये करा, तुरीला ६३०० असा भाव असून तो ७०५० रुपये करावा, अशी मागणी शेतकरी नेते भाई थावरे यांनी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे तोच हमीभाव ठेवून आधारभूत किमतीत शंभर, दोनशे रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे थावरे म्हणाले.

------

राज्य सरकारचे केले अभिनंदन

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मार्चमध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे शेतकरी नेते भाई थावरे यांनी स्वागत केले आहे.