शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र ...

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र शासनाने आज पिकांच्या आधारभूत किमतीत तुटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने थावरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

थावरे म्हणाले की, सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत भरघोस वाढत करत आहे. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. याबाबत केंद्र शासनही कसलाच विचार करत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हे माहिती असूनही याकडे केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने आज पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणत आहे. केंद्राने आज जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढवून शेतकऱ्यांना गाजर दाखविण्याचे काम केंद्राने केले आहे. आजघडीला कापसाची बॅग, वेचणीचा खर्च, औषधे, खतांच्या वाढलेल्या किमती पाहता कापसाला ६७२५ रुपये आधारभूत किंमत मिळायला पाहिजे. नांगरणी, मजुरी तसेच ऊस शेताबाहेर काढणे असा खर्च पाहता उसाचा एफआरपी ३८५० रुपये करा, तुरीला ६३०० असा भाव असून तो ७०५० रुपये करावा, अशी मागणी शेतकरी नेते भाई थावरे यांनी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे तोच हमीभाव ठेवून आधारभूत किमतीत शंभर, दोनशे रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे थावरे म्हणाले.

------

राज्य सरकारचे केले अभिनंदन

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मार्चमध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे शेतकरी नेते भाई थावरे यांनी स्वागत केले आहे.