शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

तुटपुंजी आधारभूत किंमत वाढवून केंद्राने दाखविले गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र ...

बीड : शेतकऱ्यांची खरी प्रगती करायची असेल तर शेतमालाच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. मात्र असे न करता केंद्र शासनाने आज पिकांच्या आधारभूत किमतीत तुटपुंजी वाढ करून शेतकऱ्यांना गाजर दाखविले आहे, असा आरोप शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याने थावरे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

थावरे म्हणाले की, सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीत भरघोस वाढत करत आहे. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. याबाबत केंद्र शासनही कसलाच विचार करत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हे माहिती असूनही याकडे केंद्र शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने आज पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांवर उपकार केल्याचा आव आणत आहे. केंद्राने आज जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढवून शेतकऱ्यांना गाजर दाखविण्याचे काम केंद्राने केले आहे. आजघडीला कापसाची बॅग, वेचणीचा खर्च, औषधे, खतांच्या वाढलेल्या किमती पाहता कापसाला ६७२५ रुपये आधारभूत किंमत मिळायला पाहिजे. नांगरणी, मजुरी तसेच ऊस शेताबाहेर काढणे असा खर्च पाहता उसाचा एफआरपी ३८५० रुपये करा, तुरीला ६३०० असा भाव असून तो ७०५० रुपये करावा, अशी मागणी शेतकरी नेते भाई थावरे यांनी केली आहे. मात्र वर्षानुवर्षे तोच हमीभाव ठेवून आधारभूत किमतीत शंभर, दोनशे रुपयांची वाढ करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे थावरे म्हणाले.

------

राज्य सरकारचे केले अभिनंदन

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मार्चमध्ये शेतकऱ्यांना तीन लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या या निर्णयाचे शेतकरी नेते भाई थावरे यांनी स्वागत केले आहे.