शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

शहिदांना अभिवादन करून कारगिल विजय दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST

अंबाजोगाई : येथील जय जवान आजी माजी सैनिक संस्थेतर्फे सोमवारी २२ वा कारगिल विजय दिवस शहिदांना अभिवादन करून साजरा ...

अंबाजोगाई : येथील जय जवान आजी माजी सैनिक संस्थेतर्फे सोमवारी २२ वा कारगिल विजय दिवस शहिदांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅ.पांडुरंग शेप व संपूर्ण संचालक मंडळ आणि संस्थेतील अंदाजे दोनशेहून अधिक सभासद,महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रारंभी कॅ.पांडुरंग शेप व कॅ.सय्यद खाजा नजिमोद्दीन यांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन केले. संस्था परिसरात अभिवादन सभा झाली. सूत्रसंचालन महादेव कांदे यांनी केले. प्रारंभी संस्थेचे सचिव कॅ. अभिमन्यू शिंदे यांनी कारगिल युद्धाचा इतिहास कथन केला.

---------

या कार्यक्रमात कारगिल युद्धात सक्रिय सहभाग राहिलेले संस्थेचे ज्येष्ठ संचालक कॅ. शेख उस्मान यांनी युद्धातील स्वतःच्या अनेक आठवणी व अनुभव सांगितले. प्रत्यक्ष डोळ्यांसमोर युद्धामध्ये झालेल्या शहिदांच्या शौर्याचे वर्णन करताना कॅ.उस्मान भावुक झाले तर ऐकताना श्रोत्यांना शहारून आले. शहीद जवानांच्या कुटुंबावर जे दुःख व संकट आले. त्या संकटांवर मात करण्याची ताकद जगाच्या निर्मात्याने त्यांना द्यावी असे भावनिक विचार त्यांनी व्यक्त केले.

---------

कॅ. पांडुरंग शेप म्हणाले, जे शहीद झाले त्या जवानांच्या अंत्यविधीपर्यंतच शासकीय अधिकारी दुःख व्यक्त करतात. पण,नंतर मात्र त्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनस्तरावर कोणीही विचारत नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत,सहकार्य केले जात नाही. त्यामुळे यापुढे सर्व सैनिक परिवारांनी एकत्र येऊन,याप्रश्नी लक्ष देऊन जय जवान आजी-माजी सैनिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रश्नांची सोडवणूक करून सैनिक कुटुंबाचे प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन कॅ. शेप यांनी केले.

-------

260721\img-20210726-wa0078.jpg

अंबाजोगाईत शहीद दिन साजरा