शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचा बाजार बंद, व्यापाऱ्यांच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:32 IST

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जनावरांचा बाजार बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या ...

अंबाजोगाई :

अंबाजोगाई तालुक्यासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे जनावरांचा बाजार बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी बैलजोडी खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दावणीला गर्दी करत आहेत. बाजार बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनाही बैलजोडी मिळणे जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यंदा बैलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर बैलाच्या किमती गेल्याने व्यापाऱ्याच्या दावणीला बैलजोड पाहून शेतकऱ्याला रिकाम्या हाताने परतावे लागत आसल्याचे वास्तव चित्र यंदाही पाहिला मिळत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बैल किंवा गाय म्हैस, शेळी खरेदी करायची असेल तर रेणापूर येथे चैत्रात भरणाऱ्या बाजाराचा उल्लेख होत असतो. या बाजारात विविध जातींचे बैल विक्रीसाठी येत असतात. एका बैलजोडीची किंमत चारचाकी वाहन खरेदी करता येईल, अशा किमती बाजारात ऐकायला मिळतात. सर्वसामान्य शेतकरी हे अंबाजोगाई, घाटनांदूर, आडस, मुरुड, किनगावच्या आठवडी बाजारात बैल, दुभती जनावरे खरेदी विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात करत असतात.

गुढीपाडव्यानंतर शेतकरी जनावरांच्या बाजारात उन्हाळी मशागत व पेरणीसाठी बैलाची खरेदी विक्री जास्त प्रमाणात करत असतात. अंबाजोगाई परिसरातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी चारा पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसह बैल विक्री केल्याने दावणी रिकाम्या झाल्या होत्या. त्या आजही रिकाम्याच आहेत. या वर्षीची रबीची सुगी शेतकऱ्यांच्या पदरात पडली. चारापाण्याची मुबलक सोय झाली आहे; परंतु शेतकऱ्यांच्या दावणी मात्र रिकाम्याच आहेत.

चैत्र महिन्यांपूर्वी गतवर्षीप्रमाणेच कोरोनाचा हाहाकार, लॉकडाऊन, जनता संचारबंदी सुरू झाली आहे. त्यामुळे जनावरांचे बाजार बंद आहेत. शेतीच्या उन्हाळी मशागतीसाठी शेतकऱ्यांना बैलांची आवश्यकता आहे. किमतीही गगनाला भिडल्या आहेत. जनावरांचे बाजार बंद आहेत मग बैल आणायचे कोठून? - बाळासाहेब जगताप, शेतकरी.

गावोगावी फिरून करावी लागते खरेदी

व्यापाऱ्यांनी गावोगावी फिरून बैलांची खरेदी करून बैलांची जमवाजमव करत शेतात दावणीला बैल विक्रीसाठी ठेवले आहेत. ही जमवाजमव करताना त्यांची दमछाक होत आहे. बाजार बंद असल्याने व्यापाऱ्यांनाही बैल खरेदी करावी लागत आहे, तर शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांच्या दावणीशिवाय पर्याय नसल्यामुळे बैल खरेदीसाठी ते व्यापाऱ्यांच्या शेतातील दावणीला जात आहेत.

सध्या बाजार बंद असल्याने आम्हाला गावोगावी जाऊन आगाऊ रक्कम देऊन बैल खरेदी करावे लागत आहेत. खरेदी महाग पडत आहे. त्यांना वाहनाने आणण्यासाठीचा खर्च आहे. दावणीलाही चारा, पेंढीचा दररोजचा दोन हजार रुपये खर्च येत आहेत. एवढा खर्च करून शेतात दावण लावली; पण ग्राहकच नाहीत. बैलजोडीवर गुंतवलेलेही पैसे निघणे सध्या मुश्कील झाले आहे. - मुबारक शेख, व्यापारी

===Photopath===

170421\avinash mudegaonkar_img-20210415-wa0046_14.jpg