शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाने ओलांडली नदी; बीडमधील मन सुन्न करुन टाकणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 11:57 IST

- सखाराम शिंदे गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या ...

- सखाराम शिंदे

गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या पुलामुळे मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेताना गावकऱ्यांना कसरत करावी लागली. अक्षरश: मृतदेह खांद्यावर घेऊन नदी ओलांडून न्यावा लागला.

निकिता दिनकर संत (वय १८, रा. भोजगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११च्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने हे पाऊल का उचलले, याचे गूढ कायम आहे. मात्र, भोजगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील अमृता नदीवरील पूल दीड वर्षापासून वाहून गेल्याने व सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कसा न्यायचा, असा प्रश्न होता.

अखेर गावकऱ्यांनी मृतदेह खांद्यावर घेतला व पुलाच्या उरलेल्या दीड फूट कठड्यावरून नदी पार केली. उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, दीड वर्षांपासून पुलाची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होते. याबाबत आमदार ॲड. लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.

नदीला पाणी आले की तुटतो संपर्क

अमृता नदीला पावसाचे पाणी आले की गावाचा संपर्क तुटतो. दीड फूट कठड्यावरून जीव मुठीत धरून वाट काढावी लागते. वाहने नेता येत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होते. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. २४ सप्टेंबर रोजी चक्क मृतदेह खांद्यावरून न्यावा लागल्याने गावकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली.

अमृता नदीवरील पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग तसेच आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह मंत्रालयातदेखील निवेदन देऊन मागणी केलेली आहे. पुलाचे काम रखडल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मृतदेह खांद्यावरून न्यावा लागणे हे कुचकामी प्रशासनाचे अपयश आहे.

- अरुणा विष्णू आडे, सरपंच, भोजगाव

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू