शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन बापाने ओलांडली नदी; बीडमधील मन सुन्न करुन टाकणारी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 11:57 IST

- सखाराम शिंदे गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या ...

- सखाराम शिंदे

गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथे बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. दीड वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या पुलामुळे मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेताना गावकऱ्यांना कसरत करावी लागली. अक्षरश: मृतदेह खांद्यावर घेऊन नदी ओलांडून न्यावा लागला.

निकिता दिनकर संत (वय १८, रा. भोजगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११च्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने हे पाऊल का उचलले, याचे गूढ कायम आहे. मात्र, भोजगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील अमृता नदीवरील पूल दीड वर्षापासून वाहून गेल्याने व सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कसा न्यायचा, असा प्रश्न होता.

अखेर गावकऱ्यांनी मृतदेह खांद्यावर घेतला व पुलाच्या उरलेल्या दीड फूट कठड्यावरून नदी पार केली. उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, दीड वर्षांपासून पुलाची दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दळणवळण ठप्प होते. याबाबत आमदार ॲड. लक्ष्मण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही.

नदीला पाणी आले की तुटतो संपर्क

अमृता नदीला पावसाचे पाणी आले की गावाचा संपर्क तुटतो. दीड फूट कठड्यावरून जीव मुठीत धरून वाट काढावी लागते. वाहने नेता येत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होते. याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. २४ सप्टेंबर रोजी चक्क मृतदेह खांद्यावरून न्यावा लागल्याने गावकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली.

अमृता नदीवरील पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग तसेच आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह मंत्रालयातदेखील निवेदन देऊन मागणी केलेली आहे. पुलाचे काम रखडल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. मृतदेह खांद्यावरून न्यावा लागणे हे कुचकामी प्रशासनाचे अपयश आहे.

- अरुणा विष्णू आडे, सरपंच, भोजगाव

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू