शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

बीड जिल्ह्यातला लॉकडाऊन रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:29 IST

बीड : गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका ...

बीड : गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका व्हावी. आर्थिक विवंचनेतून सर्वांनी बाहेर पडावे. याकरिता आता लॉकडाऊन रद्द करा अन्यथा जनहितास्तव एआयएमआयएम पक्ष मोर्चा काढेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक यांनी दिला आहे.

लॉकडाऊन रद्द करण्यासोबतच वीज बिल माफ करण्यात यावे, वीज कनेक्शन न कापता सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, लॉकडाऊनमुळे मार्च २० पासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेला आर्थिक मदत देण्यात यावी, अशा अन्य मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

२६ मार्च २१ पासून प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात येत आहे. याचा छोटे-छोटे व्यापारी, मोलमजुरी करणारे कामगार-श्रमिक, रिक्षाचालक, हातगाडी चालक, फळ-भाजी विक्रेते या सर्वांच्या अर्थार्जनावर विपरित परिणाम पडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून लावण्यात येणाऱ्या वारंवारच्या लॉकडाऊनमुळे हे सर्वजण आर्थिकदृष्ट्या पार डबघाईस आले आहे. अशा अवस्थेमध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन लावल्याने यात अजून जास्त भर पडली आहे. म्हणून जनतेची होत असलेली आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन रद्द करण्यात यावे किंवा सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत उद्योग व व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका एआयएमआयएम पक्षाची सुरुवातीपासून आहे.

प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफार कादरी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज़ खान लाला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्ष, सर्व संघटना, व्यापारी संघटना, सर्वसामान्य जनतेसोबत चर्चा करून मोर्चाची भूमिका स्पष्ट केली जाईल. सर्वांना सोबत घेत लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक यांच्यासह अब्दुस सलाम, हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, शेख मतीन, मोमिन अजहर, शेख एजाज खन्ना, अकबर कच्छी, सय्यद इलयास आदींची नावे व सह्या आहेत.

ग्राहकांनी थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात भरावी - अधीक्षक अभियंता

महावितरण कंपनीला वीज बिलासंदर्भात एआयएमआयएम पक्षाने तिसऱ्यांदा निवेदन देऊन मोर्चाचा इशारा दिला आहे. महावितरण कंपनी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही. परंतु ग्राहकांनीही थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात का होईना भरावीत, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि थकीत बिले वसुली चालू राहिल्याने आमच्या कंपनीवरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.