शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

व्यापा-याचा खून, तिघांना जन्मठेप; आष्टी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 23:56 IST

आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून बाळासाहेब मारोती चव्हाण (४५, रा. पिंपरखेड, ता.आष्टी) या व्यापा-यास सोबत नेवून चौघांनी दगडाने मारहाण करत अंगावर गाडी घालून निर्घृणपणे खून केला व मृतदेह आष्टी तालुक्यातील वाकी शिवारात आणून टाकला होता. या प्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. येथील जिल्हा सत्र न्या.बी.व्ही.वाघ यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. यातील चौघांपैकी तीन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली तर एकाची निर्दोष मुक्तता केली.

ठळक मुद्दे जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून बाळासाहेब मारोती चव्हाण (४५, रा. पिंपरखेड, ता.आष्टी) या व्यापा-यास सोबत नेवून चौघांनी दगडाने मारहाण करत अंगावर गाडी घालून निर्घृणपणे खून केला व मृतदेह आष्टी तालुक्यातील वाकी शिवारात आणून टाकला होता. या प्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. येथील जिल्हा सत्र न्या.बी.व्ही.वाघ यांच्या न्यायालयात हे प्रकरण चालले. यातील चौघांपैकी तीन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली तर एकाची निर्दोष मुक्तता केली.

बाळासाहेब चव्हाण हे भुश्याचा व्यापार करत होते. त्यांनी अजित इथापे आणि अमिर सय्यद या दोघांना पैसे दिले होते. याच पैशावरून त्यांचा वाद झाला होता. १० जानेवारी २०१६ रोजी हनुमंत हौसराव कवचाळे याने बाळासाहेब चव्हाण यास आपल्या सोबत दुचाकीवर नेले. पुढे कवचाळेसोबत सोबत अजित इथापे, अमिर सय्यद, गजानन चव्हाण आले.

या चौघांनी मिळून बाळासाहेब चव्हाण यास एका धाब्यावर नेऊन भरपूर दारू पाजली. डोंबळवाडी (ता.कर्जत) शिवारात नेवून बाळासाहेब चव्हाण यास दगडाने गंभीर मारहाण केली. चव्हाण हे मयत झाले असल्याचा समज आरोपींना झाल्यानंतर त्यांचा मृतदेह इतर ठिकाणी टाकून देण्यासाठी चारचाकी गाडी आणली होती. मात्र जखमी अवस्थेत असलेले बाळासाहेब चव्हाण कसेबसे उठून रस्त्याच्या कडेला थांबले होते व ये-जा करणा-यांकडे मदत मागत होते. याचवेळी आरोपींना बाळासाहेब चव्हाण हे जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शोधाशोध केली असता ते रस्त्यावर जखमी अवस्थेत उभा असल्याचे दिसले.

याचवेळी आरोपींनी त्यांच्या अंगावर गाडी घातली व गाडीच्या बेल्टने गळा आवळून त्यांचा निर्घृण खून केला. त्यानंतर मृतदेह आष्टी तालुक्यातील वाकी शिवारात आणून टाकला. या प्रकरणी मयताचा भाऊ सतिष मारोती चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी हनुमंत कवचाळे (रा.शिरापूर), अजित महादेव इथापे (रा.चिंचोली), अमिर भैय्या सय्यद (रा. शिरापूर) आणि गजानन बलभीम चव्हाण (रा.पिंपरखेड) या चौघांविरोधात आष्टी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

आष्टी ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास करून दोषारोपपत्र बीड येथील प्रथम जिल्हा व सत्र न्या.बी.व्ही.वाघ यांच्या न्यायालयात दाखल केले. साक्षी, पुरावे तपासून न्या.बी.व्ही.वाघ यांनी आरोपी हनुमंत कवचाळे, अजित इथापे आणि अमिर सय्यद या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा तसेच हनुमंत व अजित यास प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तर अमिर सय्यद यास एक हजार रूपयांचा दंडा सुनावला. गजानन चव्हाण याची निर्दोष मुक्तता केली.

सरकार पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एम.के.वाघीरकर यांनी सहकार्य केले. तर तपास अधिकारी म्हणून पोनि दिनेश आहेर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून जमादार बिनवडे यांनी सहकार्य केले.सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे डाग ठरले पुरावेसरकार पक्षाच्यावतीने २२ साक्षीदार तपासण्यात आले. दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीतील रक्ताचे डाग हे दोन पुरावे महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर काही साक्षी ही महत्त्वाच्या ठरल्या.