शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

व्यावसायिक आर्थिक संकटात; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात शाळा ...

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.

गेल्या वर्षभरात शाळा सुरू करण्यासाठी निर्णय घेताना शासनाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. अखेर १२ वी व १० वी चे वर्ग काही दिवस सुरू राहिले. पाचवी ते आठवीला परवानगी देताच पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. वर्षानुवर्षे शाळेत बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. शहरी भागात याला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण ही संकल्पनाच जिकिरीची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापेक्षा शेतीच्या कामातच मोठ्या प्रमाणात गुंतवून राहिल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व त्यांचे भवितव्य काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांपाठोपाठ व्यावसायिकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सक्तीने तीन महिने व्यवसाय बंद राहिले. परिणामी बाजारपेठेत मोठी आर्थिक मंदी निर्माण झाली. दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार व गुंतविलेल्या भांडवलाचे व्याज या चक्रातच व्यापारी अडकत गेला. सर्व सणांवर कोरोनामुळे निर्बंध लादले गेले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट राहिला. सर्वच व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले. पहिल्या कोरोना लाटेतून सावरण्याची स्थिती निर्माण होत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत तर पुन्हा व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. शासनाच्या दररोजच्या वेगवेगळ्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना कधी दुकाने उघडायची व कधी बंद करायची. यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. भांडवलाचे व्याजही भरणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एकंदरीत कोरोनाच्या लाटेने व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यासमोर मोठे संकट निर्माण केले आहे.