शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

व्यावसायिक आर्थिक संकटात; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात शाळा ...

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.

गेल्या वर्षभरात शाळा सुरू करण्यासाठी निर्णय घेताना शासनाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. अखेर १२ वी व १० वी चे वर्ग काही दिवस सुरू राहिले. पाचवी ते आठवीला परवानगी देताच पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. वर्षानुवर्षे शाळेत बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. शहरी भागात याला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण ही संकल्पनाच जिकिरीची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापेक्षा शेतीच्या कामातच मोठ्या प्रमाणात गुंतवून राहिल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व त्यांचे भवितव्य काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांपाठोपाठ व्यावसायिकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सक्तीने तीन महिने व्यवसाय बंद राहिले. परिणामी बाजारपेठेत मोठी आर्थिक मंदी निर्माण झाली. दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार व गुंतविलेल्या भांडवलाचे व्याज या चक्रातच व्यापारी अडकत गेला. सर्व सणांवर कोरोनामुळे निर्बंध लादले गेले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट राहिला. सर्वच व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले. पहिल्या कोरोना लाटेतून सावरण्याची स्थिती निर्माण होत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत तर पुन्हा व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. शासनाच्या दररोजच्या वेगवेगळ्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना कधी दुकाने उघडायची व कधी बंद करायची. यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. भांडवलाचे व्याजही भरणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एकंदरीत कोरोनाच्या लाटेने व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यासमोर मोठे संकट निर्माण केले आहे.