शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

व्यावसायिक आर्थिक संकटात; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. गेल्या वर्षभरात शाळा ...

गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्ग सातत्याने सुरूच आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.

गेल्या वर्षभरात शाळा सुरू करण्यासाठी निर्णय घेताना शासनाला सहा महिन्यांचा कालावधी लागला. अखेर १२ वी व १० वी चे वर्ग काही दिवस सुरू राहिले. पाचवी ते आठवीला परवानगी देताच पुन्हा दुसरी लाट सुरू झाली. वर्षानुवर्षे शाळेत बसून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानकच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. शहरी भागात याला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण ही संकल्पनाच जिकिरीची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापेक्षा शेतीच्या कामातच मोठ्या प्रमाणात गुंतवून राहिल्याने त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व त्यांचे भवितव्य काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांपाठोपाठ व्यावसायिकही मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सक्तीने तीन महिने व्यवसाय बंद राहिले. परिणामी बाजारपेठेत मोठी आर्थिक मंदी निर्माण झाली. दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचा पगार व गुंतविलेल्या भांडवलाचे व्याज या चक्रातच व्यापारी अडकत गेला. सर्व सणांवर कोरोनामुळे निर्बंध लादले गेले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट राहिला. सर्वच व्यवसाय मोठ्या प्रमाणात मंदावले. पहिल्या कोरोना लाटेतून सावरण्याची स्थिती निर्माण होत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेत तर पुन्हा व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. शासनाच्या दररोजच्या वेगवेगळ्या निर्बंधामुळे व्यापाऱ्यांना कधी दुकाने उघडायची व कधी बंद करायची. यातच त्यांचा वेळ जाऊ लागला. भांडवलाचे व्याजही भरणे मोठ्या मुश्किलीचे झाले आहे. व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. एकंदरीत कोरोनाच्या लाटेने व्यावसायिक, विद्यार्थी यांच्यासमोर मोठे संकट निर्माण केले आहे.