शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विजेच्या धक्क्याने तरुण जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:33 IST

बीड : जनावरांना पाणी पाजायचे होते. मात्र, वीज नसल्यामुळे फ्यूज टाकत असताना रोहित्राचा स्फोट झाल्याने एक तरुण विजेच्या ...

बीड : जनावरांना पाणी पाजायचे होते. मात्र, वीज नसल्यामुळे फ्यूज टाकत असताना रोहित्राचा स्फोट झाल्याने एक तरुण विजेच्या तीव्र धक्क्याने ठार झाला. ही घटना बीड तालुक्यातील आहेर वडगाव शिवारात १५ मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. एकुलता एक मुलगा असल्यामुळे यावेळी आई वडिलांनी एकच टाहो फोडला होता.

गणेश सुनील तावरे (वय २१) असे विजेच्या धक्क्याने ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा शिक्षणासाठी बाहेरगावी होता. त्याचे वडील सुनील तावरे व आई आहेरवडगाव शिवारातील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतात. कोरोनामुळे कॉलेज बंद असल्यामुळे तो वडिलांकडे आहेरवडगाव शिवारातील शेतात राहात होता. त्यांना तो शेतातील कामांमध्ये मदत करत होता. सोमवारी सकाळपासूनच सर्वजण शेतातील रोजची कामे करत होते. दरम्यान, जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हते. मात्र, रोहित्रामधील फ्यूज गेेलेला असल्यामुळे गणेश हा फ्यूज टाकण्यासाठी रोहित्राजवळ गेला. त्यावेळी अचानक शॉर्टसर्किट झाले व विजेचा तीव्र धक्का गणेशला लागला. क्षणार्धात त्याचा या घटनेत मृत्यू झाला. परिसरातील गवत वाळलेले असल्यामुळे मोठी आग त्याठिकाणी लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी व आई-वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश जळालेल्या मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तब्बल दोन तासानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी पाठवला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी

महावितरणकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील वायरमन त्याठिकाणी येऊन दुरुस्ती करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:लाच सर्व दुरुस्ती करावी लागते. या कारणामुळेच ही दुर्घटना घडली आहे. वेळेवर दुरुस्ती केली असती तर गणेशचा जीव वाचला असता, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.