शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा घरात घुसून चोरी; पण पोलिसांच्या हाती लागेना संशयाची दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहान थोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य ...

कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहान थोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य शेतात जातात. मग हिच संधी साधून सराईत चोरटे बंद घराचे कुलूप तोडून भर दिवसा चोऱ्या करत असताना त्या संशयित चोरीची दोरी इतका सुगावा पोलिसाच्या हाती लागत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

आष्टी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिंचपूर येथील शरद गोंदावले याच्या घरी ७ जुलै रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधून भरदिवसा घरात घुसून

घरातील पाच तोळे सोने व एक लाख साठ हजार रोख तर अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुंभेफळ येथे १९ जुलै रोजी भर दुपारी योगेश सुभाष गाडे याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आठ तोळे सोने व एक लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे आठ दिवसांच्या फरकाने हे चोरीचे प्रकार घडल्याने व पोलिसांना अद्याप कसलाच मागमूस लागला नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रात्री-अपरात्री नव्हे तर भरदिवसा चोरटे चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत असताना पोलिसांना चोर आव्हान देतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एवढे होऊनही भरदिवसा घरात घुसून चोरी होत असताना पोलिसांना थोडी देखील संशयाची दोरी हातात लागत नाही हे विशेष म्हणावे लागेल.

तालुक्यात आजवर अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या चोरीचा तपास बोटावर मोजण्या इतकाच लागला आहे. आता तर भरदिवसा चोऱ्या होत असल्याने पोलिसांचा वचक आणि गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

अन्य तीन ठिकाणीही चोऱ्या पण ठाण्यात तक्रार नाही.

याच आठवड्यात मेहकरी, सराटेवडगांव, टाकळी अमिया या ठिकाणी देखील दिवसाच चोऱ्या झाल्या आहेत. पण या लोकांनी संबंधित पोलीस ठाण्यात कसलीच तक्रार दाखल केली नाही. दिवसा घरफोडीचे सत्र कधी थांबणार व चोरटे पोलिसांना सापडतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ठाणे हद्द परिसरात नाकाबंदी, गस्त, त्याचबरोबर कोम्बिग ऑपरेशन मोहीम हाती घेतली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.