शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

शासनाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीत मंडळाधिकारी बसेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:38 IST

इमारतीची पडझड, भोवती घाणीचा विळखा, पाच वर्षांपासून कुलूप उघडले नाही नितीन कांबळे कडा : आष्टी तालुक्यातील धामणगांव आणि परिसरातील ...

इमारतीची पडझड, भोवती घाणीचा विळखा, पाच वर्षांपासून कुलूप उघडले नाही

नितीन कांबळे

कडा : आष्टी तालुक्यातील धामणगांव आणि परिसरातील अनेक गावाच्या जनतेसाठी शासनाच्या विविध महसूल सेवा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, यासाठी मंडळ अधिकारी यांचे कायमस्वरुपी कार्यालय लाखो रूपये खर्च करुन थाटले आहे. पण, येथील कार्यालय इमारत पूर्ण होऊन तेथे कार्यालय सुरु न होता तिच्या अवतीभोवती कचरा आणि घाण साचली आहे. इमारतीची आता पडझड सुरु होऊन इमारतीला उतरती कळा आली. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

अद्यापपर्यंत या इमारतीचे कुलूपच उघडले नसल्याने मंडळाधिकारी हे अद्याप एकदाही या खुर्चीवर बसले नसल्याने हे कार्यालय बकाल झाले.

मंडळाधिकारी कार्यालयातून मिळणाऱ्या प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, जनतेची गैरसोय होऊ नये, त्यांना तातडीने सेवा मिळतील, त्यांना तालुक्याला येण्याचा आर्थिक भुर्दंड बसणार नाही, यासाठी शासनाने मोठा निधी खर्च करून अद्ययावत अशी मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत बांधली आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊन जवळपास पाच वर्ष होऊन देखील या इमारतीत कार्यालय सुरु झाले नाही.

सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणारे शासकीय कार्यालय म्हणून मंडळाधिकारी कार्यालयाकडे पाहिले जाते. शेती संबंधी महत्त्वाची कामे,आपत्कालीन परिस्थितीत पंचनामे, विधवा, परितक्त्या, निराधार, अपंग, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक कामांसाठी मंडळ कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. धामणगांव येथील कार्यालयात कामकाज सुरू न केल्याने जनतेला आपली कामे करता- करता मोठा त्रास होतो. त्याचबरोबर बांधून पूर्ण असलेली इमारत घाणीच्या विळख्यात पडली आहे. तिची पडझड होऊ लागली आहे. येथे शासकीय कार्यालय थाटायचे नव्हते तर, शासनाने लाखो रुपये खर्च करून इमारत बांधली का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ह्या मंडळ कार्यालयात कामकाजास सुरूवात झाल्यास धामणगाव आणि परिसरातील अनेक गावांच्या जनतेची मोठी गैरसोय थांबेल. मंडळाधिकारी देखील फिरकत नाहीत, याकडे तहसीलदार यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यालय सुरु करावे व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ससाणे यांनी केली आहे.

याबाबत आष्टी येथील तहसीलदार शारदा दळवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, येथील मंडळाधिकारी कार्यालय अद्ययावत महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले नसून लागूनच घाणीचा विळखा असल्याने मंडळाधिकारी बसत नसल्याचे त्यांंनी सांगितले.

230821\5013img-20210820-wa0134_14.jpg