शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जिल्ह्यात कोरोना महामारीतही लाचखोरी जोरात सुरू; महसूल विभाग सर्वांत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:41 IST

बीड : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प झाले असताना दुसरीकडे लाचखोरी जोरात ...

बीड : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प झाले असताना दुसरीकडे लाचखोरी जोरात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या दीड वर्षात ३० कारवाया केल्या आहेत. यामध्ये महसूल विभाग सर्वांत पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे, तर २०२१ या वर्षात पोलीस प्रशासनात एकही कारवाई झालेली नाही.

कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कधी लॉकडाऊन, तर कधी संचारबंदी जाहीर केली आहे. यामुळे उद्योग व्यवहारासह इतर सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, अनेक जण आर्थिक संकटात सापडलेले आहेत. असे असतानाही लाचखोरी मात्र जोरात सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

एसीबीने दीड वर्षात तब्बल ४६ कारवाया केल्या आहेत. यात २०२० व २०२१ या वर्षात महसूल विभागातील १० कारवाया केल्या आहेत. इतर विभागापेक्षा महसूल विभाग लाचखोरीत सर्वांत पुढे असल्याचे दिसून येत आहे. त्याखालोखाल जिल्हा परिषद विभागाचा क्रमांक असून, नागरिकांनी त्यांच्या कामासाठी प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लाच मागितल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कारवाई करावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात येत आहे.

....

एसीबीच्या सापळ्यात अडकले ४६ जण

एसीबीकडे तक्रार आल्यानंतर २०२० व २०२१ या वर्षात आतापर्यंत ३० वेळा कारवाई करण्यात आली असून, यामध्ये जवळपास ४६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर यात काही वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. २०२१ या वर्षात कोरोना काळात लॉकडाऊन असतानादेखील ९ वेळा कारवाई करण्यात आली असून, यात ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही वेळा कारवाई करण्यासाठी परजिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकदेखील आले होते.

कोरोनाकाळात ‘महसूल’वर

कमाई जोरात

महसूल ४, जिल्हा परिषद पंचायत व शिक्षण ३, ग्रामविकास खाते १, वित्त विभाग १.

कोणत्या वर्षात किती कारवाया

२०१८ - २३

२०१९ - २३

२०२० - २१

....

शासकीय कामासाठी एखादा अधिकारी व कर्मचारी लाच मागत असेल, तर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जाईल, तसेच तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवत त्यांचे काम करून देण्याची जबाबदारी घेतली जाईल.

-बाळकृष्ण हानपुडे, उपाधीक्षक, एसीबी, बीड