शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

बीड जिल्ह्यात कापसावर पुन्हा बोंडअळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:49 IST

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कापूस पिकांवर बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी देखील कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून बांधावर जाऊन मार्गदर्शन : योग्य नियोजन केल्यास अळीचे नियंत्रण; शेतकरी धास्तावला

बीड : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून कापूस पिकांवर बोंडअळीचे संकट घोंगावत आहे. यावर्षी देखील कापूस पिकावर बोंडअळीने हल्ला केला आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केले तर बोंडअळी नियंत्रणात येऊ शकते यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती विविध माध्यमातून तसेच बांधावर जाऊन जनजागृती केली जात आहे.मागील दोन वर्ष दुष्काळी परिस्थिती तसेच यावर्षी पिके बहरात असताना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमधून कापूस काही ठिकाणी चांगल्या स्थिती आहे. परंतु वेचणीची सुरुवात होताच बोंडअळीने कापसावर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी पासाचा कालावधी वाढल्यामुळे बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. कोषातून बाहेर पडलेल्या पतंगाचे मिलन होऊन त्यांनी पानावर अंडी घातल्यानंतर ८ ते १० दिवसांनी या किडीचा प्रादुर्भाव हिरवी बोंडे व पात्यांवर होते. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच तालुकास्तरावरील अधिका-यांनी कार्यक्षेत्रातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या कराव्यात उपाययोजनाकापूस पीक असेलल्या क्षेत्रात एकरी दोन कामगंध सापळे लावावेत. त्याची सतत ३ दिवस पाहणी करावी. त्यामध्ये ७ ते ८ पतंग आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अ‍ॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.बोंडे, पात्या, फुले यामध्ये प्रादुर्भाव ५ ते १० टक्के असल्यास इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के प्रवाही १० मिली किंवा थायेडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा लेंमड सायहॅलोथ्रीन ४.९ सीएम, १० मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के एएफ २५ मिली क्लोरीपायरीफॉस २० टक्के प्रवाई २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० टक्क्यांपेक्षा जास्त आढळून आला तर इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के दाणेदार ४ ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध मिश्र किटकनाशके जसे की प्रोफेनोफॉस ४० टक्के अ सायपरमेथ्रीन ४ टक्के २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १ अ ट्रायझोफॉस ३५ टक्के प्रवाही १२.५० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५० अ सायपरमेथ्रीन ५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावी. शेतक-यांनी फवारणी करताना काळजी घ्यावी असे आवाहन बीड तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.शेतक-यांनी फरदडचा मोह टाळणे अतिआवश्यकशेतक-यांनी शेतातील बोंडअळीचे प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घ्यावे, त्यासाठी योग्य ते नियोजन करावे. या कालावधीत कापूस पिकाची वेचणी झाल्यानंतर पुन्हा अंदाज घेऊन उपाययोजना कराव्यात. डिसेंबर २०१९ या महिना अखेर शेतातील कापूस पीक अंदाजानुसार काढून टाकावे. पुढील हंगामातील बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड घेण्याचा मोह टाळून शेतातील कापूस बांधावर जाळून नष्ट करावा.

टॅग्स :BeedबीडcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र