शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह आणला ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

गेवराई : हुंड्यातील राहिलेले दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच सततच्या मानसिक व शारीरिक छळालला कंटाळून विषारी द्रव ...

गेवराई : हुंड्यातील राहिलेले दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच सततच्या मानसिक व शारीरिक छळालला कंटाळून विषारी द्रव घेतलेल्या विवाहितेचा औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट येथील गेवराई पोलीस ठाण्यात आणून माहेरच्या लोकांनी ठिय्या मांडला. याप्रकरणी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शनिवारी पहाटे गेवराई पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरा आणि दीर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील सिद्धीविनायक नगर भागात राहणाऱ्या राठोड कुटुंबातील कांचन ऊर्फ कविता विशाल राठोड (२६) हिचा विवाह विशाल राठोड सोबत २०१७ मध्ये झाला होता. लग्नातील राहिलेले हुंड्याचे दोन लाख रुपये घेऊन यावेत तसेच तुला घरातील काम व स्वयंपाक येत नाही, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ सासरच्या मंडळीकडून केला जात असे. या त्रासाला कंटाळून ९ जून रोजी कांचन राठोड हिने राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. तिच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत विवाहितेचे वडील बाबूराव घनसिंग चव्हाण (रा. माळतांडा मोगरा, ता.माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात पती विशाल साहेबराव राठोड, सासरा साहेबराव गोपीनाथ राठोड, सासू मंगलाबाई साहेबराव राठोड व दीर प्रतीक साहेबराव राठोड (सर्व रा. गेवराई) यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड या करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार आहेत.

( चौकट )

आमच्या मुलीला सासरच्या लोकांनी विषारी द्रव पाजून मारल्याचा आरोप करीत सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत मयत विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी शुक्रवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट गेवराई येथील पोलीस ठाण्यात आणला होता. गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नातेवाइकांनी ठिय्या मांडला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह नेला.

===Photopath===

260621\sakharam shinde_img-20210626-wa0013_14.jpg