शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:34 IST

बीड : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले. ...

बीड : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले. यामुळे अनेक वाहने बंद राहिली. उद्योगधंदे बंद राहिल्यामुळेही वाहतूक व्यवस्था ठप्प राहिली. याचा मोठा फटका वाहन मालक व वाहन चालक यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे वाहतूक व्यवस्थापनाचे अर्थचक्र बिघडल्याने, वाहन चालकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अंबेजोगाई : शहरातील योगेश्वरी नगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांना या रस्त्याने जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठमोठ्या खड्ड्यांत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडतात. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने घडत आहेत, अशी स्थिती असूनही शासनाच्या वतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

रस्त्याकडील झुडपांचा वाहनधारकांना त्रास

गेवराई : तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. या वर्षी मोठा पाऊस झाल्याने गवत व झुडपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने रस्त्यालगत वाढलेली ही झुडपे तोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

हातगाड्यांमुळे वाहतूककोंडी

गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने, तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. लाॅकडाऊन असलेतरी शिथिल वेळ ६ तासांची असल्याने हातगाडे उभ केले जातात. या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. जुने ते नव्या बस स्थानकापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.

चोऱ्यांमध्ये होतेय वाढ; गस्त वाढवावी

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागते. दिंद्रुड, तेलगावसह परिसरातील गावात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

बोंडअळीबाबत मार्गदर्शनाची गरज

अंबेजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी कापसावर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

राखेच्या वाहनांनी दुचाकीस्वार त्रस्त

सिरसाळा : परळी ते सिरसाळा मार्गावर धावत असलेल्या राखेच्या वाहनांमुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. चष्मा लावूनही डोळ्यामध्ये राखेचे कण जात असल्याने, या रस्त्याने दुचाकी चालविणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यात सिरसाळ्यापासून टोकवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असल्याने वारा सुटला की, त्या भट्ट्यावरील राख हवेत मिसळून राखेचे प्रदूषण होत आहे.

रात्रीची गस्त सुरू करा

अंबाजोगाई : शहर व परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वसाहतींत असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.