शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

मंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:34 IST

बीड : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले. ...

बीड : कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर, प्रवासी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले. यामुळे अनेक वाहने बंद राहिली. उद्योगधंदे बंद राहिल्यामुळेही वाहतूक व्यवस्था ठप्प राहिली. याचा मोठा फटका वाहन मालक व वाहन चालक यांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे वाहतूक व्यवस्थापनाचे अर्थचक्र बिघडल्याने, वाहन चालकांना आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त

अंबेजोगाई : शहरातील योगेश्वरी नगरी ते वाघाळा रस्ता या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. या मुख्य रस्त्यावर अनेक वसाहती आहेत. या वसाहतीतील रहिवाशांना या रस्त्याने जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोठमोठ्या खड्ड्यांत दुचाकी व चारचाकी वाहने अडकून पडतात. लहान-मोठे अपघात या रस्त्यावर सातत्याने घडत आहेत, अशी स्थिती असूनही शासनाच्या वतीने या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

रस्त्याकडील झुडपांचा वाहनधारकांना त्रास

गेवराई : तालुक्यात ग्रामीण भागात असणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. या वर्षी मोठा पाऊस झाल्याने गवत व झुडपात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे वाढल्याने रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे. प्रशासनाने रस्त्यालगत वाढलेली ही झुडपे तोडून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.

हातगाड्यांमुळे वाहतूककोंडी

गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने, तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. लाॅकडाऊन असलेतरी शिथिल वेळ ६ तासांची असल्याने हातगाडे उभ केले जातात. या रस्त्यावर मोठी वाहने उभी केली जातात. जुने ते नव्या बस स्थानकापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याची मागणी आहे.

चोऱ्यांमध्ये होतेय वाढ; गस्त वाढवावी

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागते. दिंद्रुड, तेलगावसह परिसरातील गावात गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

बोंडअळीबाबत मार्गदर्शनाची गरज

अंबेजोगाई : तालुक्यात अनेक ठिकाणी कापसावर अळीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शासनाने या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कोणत्या औषधांची फवारणी करावी, याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

राखेच्या वाहनांनी दुचाकीस्वार त्रस्त

सिरसाळा : परळी ते सिरसाळा मार्गावर धावत असलेल्या राखेच्या वाहनांमुळे दुचाकीस्वार त्रस्त झाले आहेत. चष्मा लावूनही डोळ्यामध्ये राखेचे कण जात असल्याने, या रस्त्याने दुचाकी चालविणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. त्यात सिरसाळ्यापासून टोकवाडीपर्यंत मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असल्याने वारा सुटला की, त्या भट्ट्यावरील राख हवेत मिसळून राखेचे प्रदूषण होत आहे.

रात्रीची गस्त सुरू करा

अंबाजोगाई : शहर व परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक वसाहतींत असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.