शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

माजलगाव : शासनाने पीक विम्यासंदर्भात अनेक जाचक अटी शेतकऱ्यांवर लादून अन्याय केला आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित ...

माजलगाव : शासनाने पीक विम्यासंदर्भात अनेक जाचक अटी शेतकऱ्यांवर लादून अन्याय केला आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी सकाळी परभणी चौफळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर, सांगली भागातील मदतीएवढी मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, खरीप पिके अतिवृष्टीमुळे खराब झाली, त्यामुळे खरीप पिकांचे कर्ज माफ करून तत्काळ रब्बी हंगामातील पेरणीसाठी दुसरे पीक कर्ज देण्यात यावे, ई-पीक पेरा पद्धत रद्द करावी, विमा कंपनीला ७२ तासांत ऑनलाईन तक्रार देण्याची अट रद्द करून ऑफलाईन तक्रार दाखल करून घ्यावी, आठवडा बाजार व जनावरांचा बाजार तत्काळ सुरू करावा, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे गजानन खामकर, कल्याण थेटे, श्रीकृष्ण कोके, परमेश्वर पिसुरे, आप्पा माऊली खेत्री, चत्रभुज नरसाळे, नितीन होके, भास्कर शिंदे, रामेश्वर गायकवाड, उद्धवराव मुळे, शिवप्रसाद खेत्री, भगवान रोकडे, बळीराम दराडे, लिंबाजी सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

160921\purusttam karva_img-20210916-wa0028_14.jpg