शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:40 IST

माजलगाव : शासनाने पीक विम्यासंदर्भात अनेक जाचक अटी शेतकऱ्यांवर लादून अन्याय केला आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित ...

माजलगाव : शासनाने पीक विम्यासंदर्भात अनेक जाचक अटी शेतकऱ्यांवर लादून अन्याय केला आहे. त्यामुळे शेकडो शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी सकाळी परभणी चौफळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर, सांगली भागातील मदतीएवढी मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, खरीप पिके अतिवृष्टीमुळे खराब झाली, त्यामुळे खरीप पिकांचे कर्ज माफ करून तत्काळ रब्बी हंगामातील पेरणीसाठी दुसरे पीक कर्ज देण्यात यावे, ई-पीक पेरा पद्धत रद्द करावी, विमा कंपनीला ७२ तासांत ऑनलाईन तक्रार देण्याची अट रद्द करून ऑफलाईन तक्रार दाखल करून घ्यावी, आठवडा बाजार व जनावरांचा बाजार तत्काळ सुरू करावा, आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघटनेचे गजानन खामकर, कल्याण थेटे, श्रीकृष्ण कोके, परमेश्वर पिसुरे, आप्पा माऊली खेत्री, चत्रभुज नरसाळे, नितीन होके, भास्कर शिंदे, रामेश्वर गायकवाड, उद्धवराव मुळे, शिवप्रसाद खेत्री, भगवान रोकडे, बळीराम दराडे, लिंबाजी सावंत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

160921\purusttam karva_img-20210916-wa0028_14.jpg