शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

सौताड्याच्या भूमिपुत्राचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड ...

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले डॉ. पांडुरंग सानप व जामखेड येथील एक मित्र या दोघांनी तेरा दिवसात २८५० किलोमीटर अंतर पार केले असून अद्याप ९५० किलोमीटर अंतराचा प्रवास बाकी आहे. चार दिवसात हे अंतर पूर्ण करत ते कन्याकुमारीला पोहचणार आहेत.

काश्मीरमधील थंड हवा तर कर्नाटक व तामिळनाडू येथील उष्ण हवेचा सामना करत त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. प्रदूषणमुक्त भारत, इंधन बचत हा त्यांचा नारा आहे. हा प्रवास दहा राज्यांमधून होत आहे. आता शेवटी एक तामिळनाडू राज्य बाकी आहे. या राज्यात तापमान जास्त आहे. काश्मीरमध्ये फार थंडी होती. अणि राजस्थान, कर्नाटकात सर्वाधिक तापमानाची नोंद अशा वातावरणाशी वातावरणाशी जुळवून घेत दोघांचा सायकल प्रवास सुरू आहे.

जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट भास्कर भोरे हे दोन साहसवीर ‘सायकल रायडिंग’ अर्थात सायकलवरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.

के २ के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून १४ मार्च रोजी सायंकाळी जामखेड शहरात हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वारांना निरोप देण्यात आला होता. डॉ.पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पूर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकलवर जात असतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत. दररोज सोशल मीडियावर किती प्रवास केला? कोठे आहेत ? हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनही मिळत आहेत.

===Photopath===

020421\2620popat raut_img-20210402-wa0081_14.jpg