शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

सौताड्याच्या भूमिपुत्राचा काश्मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड ...

पाटोदा : प्रदूषणमुक्त भारत व इंधन बचतीचा नारा देत काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सायकलवर निघालेल्या सौताडा येथील रहिवासी व जामखेड येथे व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले डॉ. पांडुरंग सानप व जामखेड येथील एक मित्र या दोघांनी तेरा दिवसात २८५० किलोमीटर अंतर पार केले असून अद्याप ९५० किलोमीटर अंतराचा प्रवास बाकी आहे. चार दिवसात हे अंतर पूर्ण करत ते कन्याकुमारीला पोहचणार आहेत.

काश्मीरमधील थंड हवा तर कर्नाटक व तामिळनाडू येथील उष्ण हवेचा सामना करत त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. प्रदूषणमुक्त भारत, इंधन बचत हा त्यांचा नारा आहे. हा प्रवास दहा राज्यांमधून होत आहे. आता शेवटी एक तामिळनाडू राज्य बाकी आहे. या राज्यात तापमान जास्त आहे. काश्मीरमध्ये फार थंडी होती. अणि राजस्थान, कर्नाटकात सर्वाधिक तापमानाची नोंद अशा वातावरणाशी वातावरणाशी जुळवून घेत दोघांचा सायकल प्रवास सुरू आहे.

जामखेड येथील वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. पांडुरंग सानप व केमिस्ट भास्कर भोरे हे दोन साहसवीर ‘सायकल रायडिंग’ अर्थात सायकलवरून प्रवास पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरचा प्रवासाचे ध्येय ठेवून काश्मीर ते कन्याकुमारी असा देशांच्या दोन टोकांचा प्रवास करत जनजागृती करत आहेत.

के २ के म्हणजेच काश्मीर ते कन्याकुमारी अशी त्यांची सायकल यात्रा असून १४ मार्च रोजी सायंकाळी जामखेड शहरात हिरवा झेंडा दाखवून या सायकल स्वारांना निरोप देण्यात आला होता. डॉ.पांडुरंग सानप यांनी आतापर्यंत आयर्न मॅन स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा एक तास आगोदर पूर्ण करत इतिहास रचला होता. तसेच दरवर्षी गडकिल्ल्यांवर सायकलवर जात असतात. आता ते पर्यावरण रक्षणाचा व इंधन बचतीचा संदेश देणार आहेत. दररोज सोशल मीडियावर किती प्रवास केला? कोठे आहेत ? हा संदेश देतात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहनही मिळत आहेत.

===Photopath===

020421\2620popat raut_img-20210402-wa0081_14.jpg