शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भरधाव वाळू टिप्परला ‘ब्रेक’ची गरज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:32 IST

बीड : जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून वाळू उपसा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दरम्यान, वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर ...

बीड : जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रातून वाळू उपसा मोठ्याप्रमाणात सुरू आहे. दरम्यान, वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालक वाहतूक नियमांची पायमल्ली करत आपला व इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे भरधाव वेगाला ‘ब्रेक’ लावण्याची मागणी केली जात आहे.

जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यातील काही वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले आहेत. याठिकाणावरून मोठ्याप्रमाणात वाळू उपसा व वाहतूक केली जात आहे. दरम्यान टिप्परच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. लॉकडाऊन काळात देखील वाळू वाहतूक मोठ्याप्रमाणात अवैधरित्या सुरू असून, वाळू वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली टिप्पर चालकांकडून केली जात असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. तर, भरधाव वेगातील टिप्परमधून सतत वाहतूक केल्यामुळे रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या वाळू वाहतूकदारांच्या वेगावर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

वेगाला आवरणार कोण ?

एका दिवसात दोन किंवा तीन खेपा वाळू भरून आणण्यासाठी अनेक वेळा ताशी १२० ते १४० किलोमीटरच्या वेगाने टिप्पर धावते. महामार्गावर सर्वांधिक वेगाने टिप्पर चालवले जाते, त्यामुळे महामार्गावरील तसेच अंतर्गंत रस्त्यांवरील इतर वाहनचालकांच्या जिवाला धोका कायम असतो. तर, टिप्परचा वेग रोखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वायकर यांनी केली आहे.

===Photopath===

130521\241413_2_bed_16_13052021_14.jpg

===Caption===

टिप्पर