शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांची फसवणूक करणार्‍या दुकानदारांनो सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST

अविनाश कदम लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यात महाबीज, निर्मल कंपनीचे उडीद बियाणे व खतांचा दुकानदारांकडून साठेबाजी करून कृत्रिम ...

अविनाश कदम

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : तालुक्यात महाबीज, निर्मल कंपनीचे उडीद बियाणे व खतांचा दुकानदारांकडून साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या आठ कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यासाठी कृषी विभागाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

खते, बियाणे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना दुसऱ्या कंपनीचे बियाणे, खते खरेदी करावी लागत आहेत. काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून बियाणे व खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. कृषी केंद्रचालक मनमानी किंमत आकारून खते, बियाण्यांची विक्री करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसत आहे. तोंड पाहून बियाण्यांची व खताची विक्री होत आहे. मालाचा तुटवडा तर मग ओळखीच्या लोकांना संध्याकाळी खते, बियाणे कसे उपलब्ध होते. सर्वसामान्यांना दुकानदार बियाणे शिल्लक नाही, असे सांगतात. असा सवाल शेतकरीवर्गातून विचारला जात आहे.

यावर्षी पाऊस पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी करून उडीद, तूर या पिकाकडे ओढ घेतली आहे. या बियाण्यांची वाढती मागणी पाहता तालुक्यातील काही कृषी केंद्र चालक मागणी असलेल्या महाबीज, निर्मल उडीद बियाण्याचा स्टाॅक करून ओळखीच्या लोकांना चढ्या दराने विक्री करत आहेत. एका पिशवीमागे १०० ते २०० रुपये जादा आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत.

आष्टी तालुक्यात खत उपलब्ध असूनसुद्धा खतांचा तुटवडा दाखविला जात आहे. शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रुपये चढ्या भावाने दर आकारून खताची विक्री सुरू आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉक बुकही उपलब्ध नाही. दुकानदारांनी साठेबाजी केल्याने बियाणे व खतांचा काळा बाजार होत आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

.....

कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे

तालुक्यातील कोणत्याही कृषी केंद्र चालकांनी कंपनीने जाहीर केलेल्या ग्रेडनिहाय खतांच्या किमतीपेक्षा व बियाण्यांची जास्त दराने विक्री करू नये. शेतकऱ्यांनी एकाच कंपनीचे बियाणे मागून त्याचे महत्त्व वाढवू नका. उपलब्ध असेल ते बियाणे पेरावे. शेतकऱ्यांच्या सह्या न घेतल्याने, भाव फलक न लावलेल्या आठ दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत. आठ दिवसात खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व दुकानांची तपासणी करून फसवणूक करणार्‍या दुकानदारा्ंवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी कृषी सहाय्यकांनी दुकानांना भेटी दिल्या आहेत. गुरुवारपासून सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी.

- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

....

===Photopath===

090621\img-20210609-wa0242_14.jpg

===Caption===

या फोटोतील दुकानाचे नाव कट करावे