शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

बेलगुडवाडी ग्रामस्थांचे महिला, लेकरांसह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST

७० शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा प्रश्न रखडला गेवराई जि. बीड : तालुक्यातील बेलगुडवाडी येथील ६० ते ७० शेतकऱ्यांचा रस्त्याचा ...

७० शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा प्रश्न रखडला

गेवराई जि. बीड : तालुक्यातील बेलगुडवाडी येथील ६० ते ७० शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून महिला व मुलाबाळांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

तालुक्यातील बेलगुडवाडी शिवारातील गट क्रमांक ८६ मधील पूर्वीपासून रहदारी असणारा पांदण रस्ता काही शेतकऱ्यांनी अडविल्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांचा ऊस या रस्त्यामुळे उभा असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. परंतु प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता. परंतु प्रशासनाकडून याचीही दखल न घेतल्याने सोमवारी येथील सर्व ग्रामस्थांनी महिला व मुलाबाळांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आमच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नसल्याचा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी श्रीराम पवार,ऋषिकेश पवार,रणजित पवार, शरद पवार, अंगत पवार, एकनाथ पवार, भागवत पवार, पप्पू पवार, मंजुळा पवार, भागूबाई पवार, शांता पवार, किस्किंदा पवार, सारस्वती पवार सह महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.