शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

बीड शहराचे तीन दिवस होणार ‘स्वच्छ सर्वेक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहर हगणदारीमुक्त करण्यात बीड पालिकेने यश मिळविल्यानंतर आता शहर १०० टक्के स्वच्छ करण्यासाठी पालिकेने ...

ठळक मुद्देटॉप १० मध्ये येण्यासाठी पालिकेने कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहर हगणदारीमुक्त करण्यात बीड पालिकेने यश मिळविल्यानंतर आता शहर १०० टक्के स्वच्छ करण्यासाठी पालिकेने कंबर कसली होती. याच्या तपासणीसाठी सोमवारपासून तीन दिवस बीड शहरात केंद्रीय पथक तळ ठोकून राहणार आहे. टॉप १० मध्ये येण्याच्या दृष्टीने पालिकेने प्रयत्न केले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत देशातील ४ हजार ४४ नगर पालिका, महापालिका, पंचायत समितींनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. गतवर्षी बीड पालिकेने ३०२ वा क्रमांक पटकावला होता. यावर्षी मात्र पालिकेने चांगलीच परिश्रम घेतले आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन केले. तसेच अ‍ॅपद्वारे तक्रारी घेऊन त्यांचे निरसन केले. यामध्ये बीड पालिकेला बºयापैकी यश आले. हेच मुद्दे गुण वाढविण्यासाठी लाभदायक ठरणार आहेत.

नागरिकांनीही बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांनी केले. जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके, भागवत जाधव, सुनील काळकुटे, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, ज्योती ढाका, वसीम पठाण, गौरव दुधे, आर.व्ही.डहाळे, आर.व्ही. शिनगारे, स्वाती काकडे, राजू वंजारे यांच्यासह स्वच्छता विभाग परिश्रम घेत आहे.

निकाल पंधरा दिवसांनीकेंद्र शासनाने नियुक्त केलेल्या कारवी डेटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही संस्थेची समिती सोमवारी बीडमध्ये येणार आहे. ठरवून दिलेल्या मुद्देनिहाय कामांची ते तपासणी करून आढावा घेऊन कागदपत्रांची तपासणीही करणार आहेत. बुधवारी त्यांची तपासणी संपणार आहे. याचा निकाल साधारण १५ ते २० दिवसानंतर जाहीर होईल, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.तीन हजार ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोडआपल्या भागातील तक्रारी मांडण्यासाठी पालिकेने ‘स्वच्छता अ‍ॅप’ सुरू केले होते. याच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निरसण करण्यात आले. शहरात जवळपास ३ हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. तसेच १५२१ तक्रारींचे निरसण पालिकेकडून करण्यात आले आहे.

आठ टनावर गांडूळ खताची निर्मितीबीड शहरातून जमा होणाºया ओल्या कचºयापासून पालिकेने गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. सध्या ८ टन गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे तर आणखी आठ टन खत बनविण्याच्या तयारीत आहेत. १०० किलो गांडूळ खत विक्री केल्याचेही स्वच्छता विभाग प्रमुख व्ही. टी. तिडके यांनी सांगितले.