शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बीड, वडवणी, पाटोद्यात ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:28 IST

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये दुचाकी रॅलीने दणाणला परिसरबीड : शेतकरी आणि जनसामान्यांच्या विरोधातील भाजप सरकारविरूद्ध बीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवणी फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधी घोषणांचा हल्लाबोल करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी आमदार सय्यद सलीम, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, माजी आमदार राजेंद्र जगताप यांची उपस्थिती होती. शेतकºयांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करा, बीड जिल्ह्यातील लोडशेडींग तातडीने बंद करा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, खरिप हंगामातील पिकविमा तातडीने वाटप करा, शेतीमालाला हमीभाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा, शेतातील नादुरूस्त डी.पी. दुरूस्त करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.सकाळी अकरा वाजता शिवणी फाटा येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, किसानसभेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बबन गवते, दिलीप भोसले, शिवाजी जाधव, भाऊसाहेब डावकर, अमर नाईकवाडे, रमेश चव्हाण, फारूक पटेल, फेरोज पठाण, सुधीर काकडे, सचिन शेळके, उत्तरेश्वर सोनवणे, दत्तुभाऊ जाधव, देवकते, खदीर ज्वारीवाले, इरफान बागवान, युवराज जगताप, जयतुल्ला खान, प्रभाकर पोकळे, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, प्रेम चांदणे, गणेश तांदळे, किशोर पिंगळे, बाजीराव बोबडे, बरकत पठाण, शेख इकबाल यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.वडवणीत सरकारविरोधात घोषणाबाजीभाजपच्या तीन वर्षाच्या काळात फक्त खोटी आश्वासने फसव्या योजना व जाहिरात बाजी करून जनतेला गाजर दाखवत या देशातील व राज्यातील शेतकरी कष्टकरी समाजासह व्यापाºयांना भाजप सरकारने देशोधडीला लावण्याचे काम केले. आता जनताच भाजप सरकारला जागा दाखवून देईल, असा आरोप माजी राज्यमंत्री प्रकाश सोंळके यांनी वडवणीतील मोर्चात केला. यावेळी राष्ट्रवादीचे जयसिंह सोंळके, रेखा फड, सोमनाथ बडे, पंजाबराव शिंदे, विनोदकुमार नहार, दिनेश मस्के, प्रशांत सावंत, संदिपान खळगे, गणेश शिंदे, भगवानराव लंगे, भारत जगताप, तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, विश्वास आगे, औदुंबर सांवत, शेषेराव जगताप, संतोष पवार, अस्लम कुरेशी, सचिन लंगडेसह कार्यकर्ते, शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. हल्लाबोल अांदोलन हे वसंत नाईक चौक पासून पदयात्रा तहसील कार्यालयात धडकले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सदरील मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार शेख यांना देण्यात आले.

पाटोद्यातही हल्लाबोलपाटोदा : पाटोदा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शिवभूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसीलवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कर्ज माफीची खोटी आश्वासने, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतीमालाला मिळणारा हमीभाव, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव अशा खोट्या आश्वासने देणाºया भाजप सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यता आल्याचे राष्ट्रवादीने कळविले आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून हल्लाबोल आंदोलन झाले. यावेळी मोर्चात बाळासाहेब आजबे, शिवाजी राऊत, महेबूब शेख, अण्णासाहेब चौधरी, सतीश बडे, गुलाबराव घुमरे आदी सहभागी झाले होते.