शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

बीड, वडवणी, पाटोद्यात ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:28 IST

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

बीड : अवघ्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसने सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चाद्वारे रान पेटविलेले आहे. विविध फसव्या योजनांच्या माध्यमातुन सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक करत आहे, यावर मोठा जनाक्रोश सुरु आहे. जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढले जात आहेत. बुधवारी बीड, पाटोदा व वडवणीमध्ये हल्लाबोल मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बीडमध्ये दुचाकी रॅलीने दणाणला परिसरबीड : शेतकरी आणि जनसामान्यांच्या विरोधातील भाजप सरकारविरूद्ध बीड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवणी फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकारविरोधी घोषणांचा हल्लाबोल करीत दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये माजी आमदार सय्यद सलीम, ज्येष्ठ नेते डी.बी.बागल, माजी आमदार राजेंद्र जगताप यांची उपस्थिती होती. शेतकºयांचे सरसकट कर्जमाफ करून सातबारा कोरा करा, बीड जिल्ह्यातील लोडशेडींग तातडीने बंद करा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, खरिप हंगामातील पिकविमा तातडीने वाटप करा, शेतीमालाला हमीभाव द्या, खरेदी केंद्र सुरू करा, शेतातील नादुरूस्त डी.पी. दुरूस्त करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.सकाळी अकरा वाजता शिवणी फाटा येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये संदीप क्षीरसागर, गंगाधर घुमरे, किसानसभेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, बबन गवते, दिलीप भोसले, शिवाजी जाधव, भाऊसाहेब डावकर, अमर नाईकवाडे, रमेश चव्हाण, फारूक पटेल, फेरोज पठाण, सुधीर काकडे, सचिन शेळके, उत्तरेश्वर सोनवणे, दत्तुभाऊ जाधव, देवकते, खदीर ज्वारीवाले, इरफान बागवान, युवराज जगताप, जयतुल्ला खान, प्रभाकर पोकळे, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, प्रेम चांदणे, गणेश तांदळे, किशोर पिंगळे, बाजीराव बोबडे, बरकत पठाण, शेख इकबाल यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.वडवणीत सरकारविरोधात घोषणाबाजीभाजपच्या तीन वर्षाच्या काळात फक्त खोटी आश्वासने फसव्या योजना व जाहिरात बाजी करून जनतेला गाजर दाखवत या देशातील व राज्यातील शेतकरी कष्टकरी समाजासह व्यापाºयांना भाजप सरकारने देशोधडीला लावण्याचे काम केले. आता जनताच भाजप सरकारला जागा दाखवून देईल, असा आरोप माजी राज्यमंत्री प्रकाश सोंळके यांनी वडवणीतील मोर्चात केला. यावेळी राष्ट्रवादीचे जयसिंह सोंळके, रेखा फड, सोमनाथ बडे, पंजाबराव शिंदे, विनोदकुमार नहार, दिनेश मस्के, प्रशांत सावंत, संदिपान खळगे, गणेश शिंदे, भगवानराव लंगे, भारत जगताप, तालुकाध्यक्ष बजरंग साबळे, विश्वास आगे, औदुंबर सांवत, शेषेराव जगताप, संतोष पवार, अस्लम कुरेशी, सचिन लंगडेसह कार्यकर्ते, शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते. हल्लाबोल अांदोलन हे वसंत नाईक चौक पासून पदयात्रा तहसील कार्यालयात धडकले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. सदरील मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार शेख यांना देण्यात आले.

पाटोद्यातही हल्लाबोलपाटोदा : पाटोदा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने शिवभूषण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पाटोदा तहसीलवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. कर्ज माफीची खोटी आश्वासने, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतीमालाला मिळणारा हमीभाव, गॅस, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव अशा खोट्या आश्वासने देणाºया भाजप सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यता आल्याचे राष्ट्रवादीने कळविले आहे. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करून हल्लाबोल आंदोलन झाले. यावेळी मोर्चात बाळासाहेब आजबे, शिवाजी राऊत, महेबूब शेख, अण्णासाहेब चौधरी, सतीश बडे, गुलाबराव घुमरे आदी सहभागी झाले होते.